शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

समर्पित कार्यकर्त्यांमुळे समरसता गतिमान

By admin | Updated: December 26, 2016 03:52 IST

सामाजिक समरसता हा एकेकाळी कुचेष्टेचा असलेला विषय मान्य होऊन आज देशव्यापी बनला आहे. विरोध होऊनही त्याची

पुणे : सामाजिक समरसता हा एकेकाळी कुचेष्टेचा असलेला विषय मान्य होऊन आज देशव्यापी बनला आहे. विरोध होऊनही त्याची प्रक्रिया सुरेश नाशिककर यांच्यासारख्या समर्पित कार्यकर्त्यांमुळे गतिमान झाली, असे गौरवोद्गार राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष भिकुजी इदाते यांनी रविवारी येथे काढले.सामाजिक समरसता मंचतर्फे माजी उपमहापौर, परिट समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ऊर्फ नाना नाशिककर यांचा संत गाडगेबाबा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी समरसता मंचचे संस्थापक सदस्य रमेश महाजन, सहसंयोजक रमेश पांडव, प्रांत कार्यवाह विजय गावडे, शहर अध्यक्ष नंदकुमार राऊत, समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्ष श्यामाताई घोणसे, कमल नाशिककर आदी व्यासपीठावर होते. २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पारितोषिकाचे स्वरूप होते. सत्काराला उत्तर देताना नाशिककर यांनी अनेक आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता दोनदा डेक्कनसारख्या भागातून पालिकेवर गेला. मतांचा बाजार होत असताना लोकांच्या पाठबळावर उपमहापौरही झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार डोळ्यांसमोर ठेवून काम केल्याने यश मिळाले. सामाजिक कीर्तनाचा आदर्श घालून देणाऱ्या गाडगेबाबा यांच्या नावाचा उल्लेख कीर्तनकार करत नाहीत. त्यामुळे ५० कीर्तने विविध भागांत करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.श्यामाताई घोणसे यांनी नाशिककर यांच्या प्रकाशन व्यवसायाची माहिती सांगितली. सुनील भणगे यांनी स्वागत केले. विजय गावडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)