शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

समर्पित कार्यकर्त्यांमुळे समरसता गतिमान

By admin | Updated: December 26, 2016 03:52 IST

सामाजिक समरसता हा एकेकाळी कुचेष्टेचा असलेला विषय मान्य होऊन आज देशव्यापी बनला आहे. विरोध होऊनही त्याची

पुणे : सामाजिक समरसता हा एकेकाळी कुचेष्टेचा असलेला विषय मान्य होऊन आज देशव्यापी बनला आहे. विरोध होऊनही त्याची प्रक्रिया सुरेश नाशिककर यांच्यासारख्या समर्पित कार्यकर्त्यांमुळे गतिमान झाली, असे गौरवोद्गार राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष भिकुजी इदाते यांनी रविवारी येथे काढले.सामाजिक समरसता मंचतर्फे माजी उपमहापौर, परिट समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ऊर्फ नाना नाशिककर यांचा संत गाडगेबाबा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी समरसता मंचचे संस्थापक सदस्य रमेश महाजन, सहसंयोजक रमेश पांडव, प्रांत कार्यवाह विजय गावडे, शहर अध्यक्ष नंदकुमार राऊत, समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्ष श्यामाताई घोणसे, कमल नाशिककर आदी व्यासपीठावर होते. २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पारितोषिकाचे स्वरूप होते. सत्काराला उत्तर देताना नाशिककर यांनी अनेक आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता दोनदा डेक्कनसारख्या भागातून पालिकेवर गेला. मतांचा बाजार होत असताना लोकांच्या पाठबळावर उपमहापौरही झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार डोळ्यांसमोर ठेवून काम केल्याने यश मिळाले. सामाजिक कीर्तनाचा आदर्श घालून देणाऱ्या गाडगेबाबा यांच्या नावाचा उल्लेख कीर्तनकार करत नाहीत. त्यामुळे ५० कीर्तने विविध भागांत करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.श्यामाताई घोणसे यांनी नाशिककर यांच्या प्रकाशन व्यवसायाची माहिती सांगितली. सुनील भणगे यांनी स्वागत केले. विजय गावडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)