शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

अपघात की घातपात?

By admin | Updated: July 17, 2014 03:24 IST

निकिताचा मृत्यू अपघात नसून, हा घातपाताचा प्रकार आहे. मुलीला मारणाऱ्यांना ताब्यात घ्या, अटक करा,’ असा टाहो निकिताची आई सीता निसर्गंध यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर फोडला

पिंपरी : ‘निकिताचा मृत्यू अपघात नसून, हा घातपाताचा प्रकार आहे. मुलीला मारणाऱ्यांना ताब्यात घ्या, अटक करा,’ असा टाहो निकिताची आई सीता निसर्गंध यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर फोडला. त्यामुळे निकिताचा मृत्यू अपघात की घातपात आहे याचा छडा लावणे, या घटनेची उकल करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. ‘गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही’ अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. निगडीतील भक्ती-शक्ती चौक - भोसरी स्पाइन रस्त्यावर चिखलीत महापालिकेचा स्वस्तातील घरकुल हा गृहप्रकल्प आहे. घरकुल सहकारी गृहरचना संस्थेतील कुलस्वामिनी इमारत (३१, सी २३) आहे. त्यातील पाचव्या मजल्यावर ५०३ क्रमांकाची सदनिका सीता निसर्गंध यांची आहे. पतीचे निधन झाले असल्याने ३ मुली आणि २ मुलांसह त्या येथे वास्तव्यास आहेत. धुणी-भांडी करण्याचे काम करीत असल्याने घराबाहेर पडल्या होत्या. निकिताची भावंडेही शाळेत गेली होती. ती घरात एकटीच होती. भंगारवाल्यामुळे घटना उघड प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कुलस्वामिनी इमारतीत सकाळी पावणेअकराच्या सुमारास एक भंगारवाला आला. त्याला पार्किंगमध्ये एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्याने याबाबतची माहिती इतर सदनिकाधारकांना दिली. त्यानंतर संजय ओव्हाळ, जनार्दन उबाळे, श्रीरंग कोळेकर, अजित गायकवाड यांनी धाव घेऊन निकिताला रिक्षातून जवळच्या रुग्णालयात नेले, तर काहींनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर मृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात नेला. दरम्यान, याच कालखंडात दोन संशयित व्यक्ती येथे सापडल्याने त्यांनाही नागरिकांनी चोप दिला. गौतम गायकवाड म्हणाले, ‘‘निकिता ही माझ्या भाचीची मुलगी आहे. घटनास्थळ पाहता तिने उडी मारलेली दिसत नाही. तिला कोणीतरी ढकलून दिले आहे. तिचा मृत्यू अपघाती नसून, घातपाताचाच प्रकार असण्याची दाट शक्यता आहे. याचा तपास करण्याची गरज आहे.’’ नातेवाइकांनी तिच्या आईची समजूत काढल्यानंतर सायंकाळी सहानंतर निकिताचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले. संरक्षक कठडे बसवावेत जेथून निकिता पडली. तेथील भिंत अडीच फूट उंचीची आहे. त्यावर संरक्षक कठडे बसविलेले नाहीत. येथे संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. (प्रतिनिधी)