शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अबब....देशात सव्वा अब्ज मोबाईल!!!; दिल्लीत सर्वात जास्त मोबाईलधारक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 15:34 IST

दिल्लीमध्ये प्रतिशंभर मोबाईलधारकांमागे तब्बल २४६ मोबाईल असून, पाठोपाठ कोलकाता आणि मुंबई या महानगरांमध्ये मोबाईलची संख्या अधिक असल्याची माहिती दूरसंचार विभागाने दिली. 

ठळक मुद्देदिल्लीमध्ये प्रतिशंभर मोबाईलधारकांमागे तब्बल २४६ मोबाईलमोबाईलवापरात बिहार सर्वात गरीब राज्य ठरले असून, येथील सरासरी अवघी ६०.८२ इतकी

विशाल शिर्के पुणे : जगाची लोकसंख्या ही साडेसात अब्ज इतकी मानली जाते. त्यात चीन पाठोपाठ देशाची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकाची आहे. यात मोबाईलची संख्या पाहिल्यास ही तब्बल १२१ कोटी इतकी भरते. दिल्लीमध्ये प्रतिशंभर मोबाईलधारकांमागे तब्बल २४६ मोबाईल असून, पाठोपाठ कोलकाता आणि मुंबई या महानगरांमध्ये मोबाईलची संख्या अधिक असल्याची माहिती दूरसंचार विभागाने दिली. चीनची लोकसंख्या ही १३८ कोटी दरम्यान आहे. त्यानंतर भारतात १३२ कोटी ४१ लाख जनसंख्या येते. वापराच्या आणि किंमतीच्या दृष्टीने मोबाईल आवाक्यात आल्याने दूरसंचार उद्योगाने मोठी झेप घेतली आहे. वैयक्तिक संपर्काच्या दृष्टीने उपयोगित असल्याने अगदी गरीबातील गरीब आणि श्रीमंताच्या हातात या यंत्राने आपले स्थान पक्के केल्याचे दिसून येत आहे. दूरसंचार विभागाने दिलेल्या प्रफुल सारडा यांना ३१ आॅगस्ट २०१७ अखेरपर्यंतची मोबाईलची आकडेवारी माहिती अधिकारात उपलब्ध करुन दिली आहे. त्या नुसार राजधानी दिल्लीने प्रथम क्रमांक पटाकविला आहे. येथे दर शंभर लोकसंख्येमागे २४६.१४ मोबाईल आहेत. पाठोपाठ कोलकाता येथे १८४.३६ आणि मुंबईत १५४.६८ मोबाईल आहेत. हिमाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळा, पंजाब आणि तमिळनाडूत प्रतिशंभर लोकसंख्येमागे सरासरी शंभराहून अधिक मोबाईल आहेत. मुंबई वगळून उर्वरीत महाराष्ट्रात दरशंभर लोकसंख्येमागे ९४.१२ मोबाईल आहेत. मोबाईलवापरात बिहार सर्वात गरीब राज्य ठरले असून, येथील सरासरी अवघी ६०.८२ इतकी आहे. नीचांकी मोबाईल वापरात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आसाममध्ये शंभरामागे ६६.९० मोबाईल आहेत. देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात हाच दर ७३.९० इतका आहे. एकूण देशाचा विचार करता, शंभर लोकसंख्येमागे मोबाईलची संख्या ९१.९० इतकी आहे. 

शंभर लोकसंख्येमागे मोबाईलची संख्या

राज्य                                       मोबाईलआंध्रप्रदेश                                ९५.३०आसाम                                    ६६.९०बिहार                                      ६०.८२गुजरात                                   ११२.३९हरयाणा                                  ९०.०२हिमाचल प्रदेश                       १४९.०९जम्मू काश्मीर                        ९९.२४कर्नाटका                                १११.८१केरळ                                     ११३.१४मध्यप्रदेश                             ६७.५३महाराष्ट्र                                ९४.१२उत्तर-पूर्व भारत                    ९१.३३ओडिसा                                ८०.४०पंजाब                                  ११८.२७राजस्थान                            ९०.२३तमिळनाडू                           १२६.६८उत्तरप्रदेश                          ७३.९०पश्चिम बंगाल                     ७३.३७कोलकाता                           १८४.३६दिल्ली                                २४६.१४मुंबई                                   १५४.६८—————————————----------एकूण                                  ९१.९०

कथा मोबाईलची अमेरिकेतील मार्टीन कुपर यांनी १९७३ साली प्रथम मोबाईलवरुन डॉ. जोएल एंगल यांना कॉल केला. त्यानंतर १९८० नंतर व्यावसायिक स्तरावर त्याची सुरुवात व्हायला लागली. देशात १९९५ साली तत्कालिन दूरसंचार मंत्री सुखराम यांनी पश्चिम बंगालचे तत्कालिन मुख्यमंत्री ज्योती बसू यांना पहिला मोबाईल कॉल केला. त्यानंतर २००५ सालानंतर देशात मोबाईलधारकांची संख्या झपाट्याने वाढू लागली.  

टॅग्स :MobileमोबाइलNew Delhiनवी दिल्लीAmericaअमेरिका