शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

पीएमपीवर ७० कोटींची पालिकेकडून मेहेरबानी

By admin | Updated: November 18, 2014 03:29 IST

पीएमपीच्या स्थापनेला ७ वर्षे झाली, तरी अद्याप कारभार सक्षम झालेला नाही. दरदिवशी तोटा वाढत आहे. त्यामुळे पीएमपीने सीएनजी ठेकेदारांची बिले थकविली होती.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचाऱ्यांच्या पगारातील फरक व आर्थिक तूट भरून काढण्यासाठी तब्बल ७० कोटी निधी देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने आज मंजुरी दिली. पीएमपीचा कारभार सुधारण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करण्याऐवजी वेळोवेळी आवश्यक निधी देऊन महापालिकेने पीएमपीच्या प्रशासनावर मेहेरबानी सुरू केल्याची चर्चा आहे. पीएमपीच्या स्थापनेला ७ वर्षे झाली, तरी अद्याप कारभार सक्षम झालेला नाही. दरदिवशी तोटा वाढत आहे. त्यामुळे पीएमपीने सीएनजी ठेकेदारांची बिले थकविली होती. वेळेत थकबाकी दिली नाही, तर सीएनजी पुरवठा बंद करण्याचे पत्र पीएमपी प्रशासनाला दिले. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सीएनजी बिले व आर्थिक तूट भरून काढण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली. दरम्यान, पीएमपी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अनेक वर्षे दिलेली नाही. महापालिकेच्या अर्थसंकल्पात कर्मचाऱ्याच्या फरकासाठी २७ कोटींची तरतूद होती. उर्वरित २३ कोटी अखर्चिक रक्कम मिळून साधारणत: ५० कोटींची रक्कम देण्याच्या ठरावाला स्थायी समितीने आज मान्यता दिली, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे यांनी आज दिली. (प्रतिनिधी)