राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जानेवारी महिन्यात महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली होती. परंतु, अद्याप राज्य शासन महाविद्यालये सुरु करण्याबाबत गंभीर नाही. महाविद्यालये सुरु होत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शैक्षणिक वर्ष संपत आले, तरी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल सुरु झालेले नाही. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी व अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विविध महाविद्यालयांसमोर आंदोलन केले. दरम्यान स. प. महाविद्यालयासमोर आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी विद्यार्थी व अभाविपच्या कार्यकर्त्यांना त्याब्यात घेऊन काही कालावधीनंतर सोडून दिले.
-----------------------
राज्य शासनाला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची कोणतीच काळजी नाही. राज्य शासन लाखो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे. महाविद्यालये सुरु करण्याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून सर्व महाविद्यालये पुढील २ दिवसांत सुरु करावी, अन्यथा अभाविप तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी दिला.