शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

‘सत्यमेव जयते’बाबत आमिर खानला उत्तर देण्याचे निर्देश

By admin | Updated: March 12, 2016 03:54 IST

बॉलीवूड अभिनेता आमिर खान याचा दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘सत्यमेव जयते’विरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राजमुद्रेचा वापर न करताच ‘सत्यमेव जयते’ असे लिहिण्यात येत

मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खान याचा दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘सत्यमेव जयते’विरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राजमुद्रेचा वापर न करताच ‘सत्यमेव जयते’ असे लिहिण्यात येत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. याबाबत उच्च न्यायालयाने संबंधित दूरचित्रवाणी वाहिनी आणि आमीर खान याला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ‘सत्यमेव जयते’ हे राष्ट्रीय चिन्हाचा भाग आहे. मात्र या कार्यक्रमात राजमुद्रेचा वापर न करता केवळ ‘सत्यमेव जयते’चा वापर करण्यात येतो. त्यामुळे ‘स्टेट एम्ब्लेम आॅफ इंडिया’ (प्रतिबंध आणि अयोग्य वापर) कायदा आणि ‘स्टेट एम्ब्लेम आॅफ इंडिया’ (वापरासंबंधी नियम) नियमांचे उल्लंघन केले जात आहे, असे याचिकाकर्ते मनोरंजन रॉय यांनी याचिकेत नमूद केले आहे.या याचिकेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने केवळ ‘सत्यमेव जयते’चा वापर करून कायद्याचे किंवा नियमाचे उल्लंघन करण्यात आले नसल्याची भूमिका उच्च न्यायालयापुढे घेतली. ‘बोधचिन्हातील ‘सत्यमेव जयते’च वापरल्याने कायद्याचा किंवा नियमांचा भंग होत नाही. राष्ट्रीय बोधचिन्हाचा गैरवापर होऊ नये, यासाठी कायद्यात व नियमांत तरतूद करण्यात आली आहे, असे गृहमंत्रालयाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. भविष्यात कोणी बोधचिन्ह म्हणून केवळ राजमुद्राच वापरली आणि ‘सत्यमेव जयते’ वापरले नाही तरीही तुम्ही अशीच भूमिका घ्याल का?, अशी विचारणा न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी केंद्राला केली. अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांना २० मार्च रोजीच्या सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)