शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

‘सत्यमेव जयते’बाबत आमिर खानला उत्तर देण्याचे निर्देश

By admin | Updated: March 12, 2016 03:54 IST

बॉलीवूड अभिनेता आमिर खान याचा दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘सत्यमेव जयते’विरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राजमुद्रेचा वापर न करताच ‘सत्यमेव जयते’ असे लिहिण्यात येत

मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खान याचा दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘सत्यमेव जयते’विरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राजमुद्रेचा वापर न करताच ‘सत्यमेव जयते’ असे लिहिण्यात येत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. याबाबत उच्च न्यायालयाने संबंधित दूरचित्रवाणी वाहिनी आणि आमीर खान याला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ‘सत्यमेव जयते’ हे राष्ट्रीय चिन्हाचा भाग आहे. मात्र या कार्यक्रमात राजमुद्रेचा वापर न करता केवळ ‘सत्यमेव जयते’चा वापर करण्यात येतो. त्यामुळे ‘स्टेट एम्ब्लेम आॅफ इंडिया’ (प्रतिबंध आणि अयोग्य वापर) कायदा आणि ‘स्टेट एम्ब्लेम आॅफ इंडिया’ (वापरासंबंधी नियम) नियमांचे उल्लंघन केले जात आहे, असे याचिकाकर्ते मनोरंजन रॉय यांनी याचिकेत नमूद केले आहे.या याचिकेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने केवळ ‘सत्यमेव जयते’चा वापर करून कायद्याचे किंवा नियमाचे उल्लंघन करण्यात आले नसल्याची भूमिका उच्च न्यायालयापुढे घेतली. ‘बोधचिन्हातील ‘सत्यमेव जयते’च वापरल्याने कायद्याचा किंवा नियमांचा भंग होत नाही. राष्ट्रीय बोधचिन्हाचा गैरवापर होऊ नये, यासाठी कायद्यात व नियमांत तरतूद करण्यात आली आहे, असे गृहमंत्रालयाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. भविष्यात कोणी बोधचिन्ह म्हणून केवळ राजमुद्राच वापरली आणि ‘सत्यमेव जयते’ वापरले नाही तरीही तुम्ही अशीच भूमिका घ्याल का?, अशी विचारणा न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी केंद्राला केली. अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांना २० मार्च रोजीच्या सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)