शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

87.23%जिल्ह्याचा निकाल

By admin | Updated: May 26, 2016 03:35 IST

इयत्ता बारावीचा जिल्ह्याचा एकूण निकाल ८७.२३ टक्के लागला असून, मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ९२.१० टक्के मुली, तर ८३.१८ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

पुणे : इयत्ता बारावीचा जिल्ह्याचा एकूण निकाल ८७.२३ टक्के लागला असून, मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ९२.१० टक्के मुली, तर ८३.१८ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. पुणे विभागात जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात १ लाख १४ हजार ६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख १३ हजार ९१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये ४७ हजार ६४४ मुलींचा समावेश आहे, तर ५१ हजार ७३० मुले उत्तीर्ण झाली आहेत. वेल्हा तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक लागला आहे. तर सर्वांत कमी निकाल मावळ तालुक्याचा ८२. ६८ टक्के लागला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये मुलींची निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १० टक्के अधिक आहे. जिल्ह्याच्या तालुकानिहाय निकालाची टक्केवारी आंबेगाव - ९१.४६बारामती - ८९.५९भोर - ८५.३९दौंड - ८४.५१हवेली - ८५.३३इंदापूर - ८९.१५जुन्नर - ८६.६०खेड - ८६.६९मावळ - ८२.६८मुळशी - ८४.४८पुरंदर - ८६.९८शिरूर - ९०.३०वेल्हा - ९३.७३पुणे शहर (प.) - ८७.२०पुणे शहर (पू.) - ८५.५२पिंपरी चिंचवड - ९०.०१विभाग निहाय व श्रेणी निहाय उत्तीर्ण विद्यार्थी विभाग७५% व पुढे६०% व पुढे पुणे१२,७७६७,०५३नागपूर७,६०५४०,९१३औरंगाबाद११,८९९७०,०४४मुंबई३३,३७३८६,६२२कोल्हापूर६,५४३३५,८९७अमरावती८,८५५५०,०१९नाशिक५,४३९५४,२१०लातूर५,६६०२५,३५१कोकण१,९७८११,५५८काही वर्षांपासून राज्य मंडळाच्या निकालाच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत चालली होती. सीबीएसई बोर्डाप्रमाणे राबविलेल्या जात असलेल्या ८०/२० पॅटर्नमुळे कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सरसकट २० पैकी २० गुण दिले जात असल्याने निकाल फुगलेला दिसत होता. मात्र, यंदा प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी बहि:स्थ परीक्षकांची नियुक्ती केली. त्यामुळे बारावीच्या २०१६ च्या निकालात ४.६६ टक्क्यांनी घट झाली. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल चांगला लागावा, या हेतूने काही शिक्षकांकडून प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे गुण सढळ हाताने दिले जात होते. परिणामी विद्यार्थ्यांना १५ ते २० टक्के गुण सहज मिळत होते. त्यामुळेच निकालाची टक्केवारी वाढत चालली होती. मात्र, राज्य मंडळाने यंदा बारावीच्या परीक्षेसाठी रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बहि:स्थ परीक्षांची नियुक्ती केली होती. त्याचप्रमाणे पर्यावरण शिक्षण परीक्षेसाठीही बहि:स्थ शिक्षक नियुक्त करण्यात आले.त्यामुळे विद्यार्थ्यांना सढळ हाताने दिल्या जाणाऱ्या गुणांवर यंदा नियंत्रण आले. त्याचप्रमाणे गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या जात होत्या. त्यामुळे यंदा बारावीच्या निकालात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते.- गंगाधर म्हामणे, राज्य मंडळाचे अध्यक्ष