शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

87.23%जिल्ह्याचा निकाल

By admin | Updated: May 26, 2016 03:35 IST

इयत्ता बारावीचा जिल्ह्याचा एकूण निकाल ८७.२३ टक्के लागला असून, मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ९२.१० टक्के मुली, तर ८३.१८ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

पुणे : इयत्ता बारावीचा जिल्ह्याचा एकूण निकाल ८७.२३ टक्के लागला असून, मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ९२.१० टक्के मुली, तर ८३.१८ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. पुणे विभागात जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात १ लाख १४ हजार ६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख १३ हजार ९१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये ४७ हजार ६४४ मुलींचा समावेश आहे, तर ५१ हजार ७३० मुले उत्तीर्ण झाली आहेत. वेल्हा तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक लागला आहे. तर सर्वांत कमी निकाल मावळ तालुक्याचा ८२. ६८ टक्के लागला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये मुलींची निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १० टक्के अधिक आहे. जिल्ह्याच्या तालुकानिहाय निकालाची टक्केवारी आंबेगाव - ९१.४६बारामती - ८९.५९भोर - ८५.३९दौंड - ८४.५१हवेली - ८५.३३इंदापूर - ८९.१५जुन्नर - ८६.६०खेड - ८६.६९मावळ - ८२.६८मुळशी - ८४.४८पुरंदर - ८६.९८शिरूर - ९०.३०वेल्हा - ९३.७३पुणे शहर (प.) - ८७.२०पुणे शहर (पू.) - ८५.५२पिंपरी चिंचवड - ९०.०१विभाग निहाय व श्रेणी निहाय उत्तीर्ण विद्यार्थी विभाग७५% व पुढे६०% व पुढे पुणे१२,७७६७,०५३नागपूर७,६०५४०,९१३औरंगाबाद११,८९९७०,०४४मुंबई३३,३७३८६,६२२कोल्हापूर६,५४३३५,८९७अमरावती८,८५५५०,०१९नाशिक५,४३९५४,२१०लातूर५,६६०२५,३५१कोकण१,९७८११,५५८काही वर्षांपासून राज्य मंडळाच्या निकालाच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत चालली होती. सीबीएसई बोर्डाप्रमाणे राबविलेल्या जात असलेल्या ८०/२० पॅटर्नमुळे कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सरसकट २० पैकी २० गुण दिले जात असल्याने निकाल फुगलेला दिसत होता. मात्र, यंदा प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी बहि:स्थ परीक्षकांची नियुक्ती केली. त्यामुळे बारावीच्या २०१६ च्या निकालात ४.६६ टक्क्यांनी घट झाली. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल चांगला लागावा, या हेतूने काही शिक्षकांकडून प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे गुण सढळ हाताने दिले जात होते. परिणामी विद्यार्थ्यांना १५ ते २० टक्के गुण सहज मिळत होते. त्यामुळेच निकालाची टक्केवारी वाढत चालली होती. मात्र, राज्य मंडळाने यंदा बारावीच्या परीक्षेसाठी रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बहि:स्थ परीक्षांची नियुक्ती केली होती. त्याचप्रमाणे पर्यावरण शिक्षण परीक्षेसाठीही बहि:स्थ शिक्षक नियुक्त करण्यात आले.त्यामुळे विद्यार्थ्यांना सढळ हाताने दिल्या जाणाऱ्या गुणांवर यंदा नियंत्रण आले. त्याचप्रमाणे गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या जात होत्या. त्यामुळे यंदा बारावीच्या निकालात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते.- गंगाधर म्हामणे, राज्य मंडळाचे अध्यक्ष