शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

87.23%जिल्ह्याचा निकाल

By admin | Updated: May 26, 2016 03:35 IST

इयत्ता बारावीचा जिल्ह्याचा एकूण निकाल ८७.२३ टक्के लागला असून, मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ९२.१० टक्के मुली, तर ८३.१८ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

पुणे : इयत्ता बारावीचा जिल्ह्याचा एकूण निकाल ८७.२३ टक्के लागला असून, मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ९२.१० टक्के मुली, तर ८३.१८ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. पुणे विभागात जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात १ लाख १४ हजार ६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख १३ हजार ९१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये ४७ हजार ६४४ मुलींचा समावेश आहे, तर ५१ हजार ७३० मुले उत्तीर्ण झाली आहेत. वेल्हा तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक लागला आहे. तर सर्वांत कमी निकाल मावळ तालुक्याचा ८२. ६८ टक्के लागला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये मुलींची निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १० टक्के अधिक आहे. जिल्ह्याच्या तालुकानिहाय निकालाची टक्केवारी आंबेगाव - ९१.४६बारामती - ८९.५९भोर - ८५.३९दौंड - ८४.५१हवेली - ८५.३३इंदापूर - ८९.१५जुन्नर - ८६.६०खेड - ८६.६९मावळ - ८२.६८मुळशी - ८४.४८पुरंदर - ८६.९८शिरूर - ९०.३०वेल्हा - ९३.७३पुणे शहर (प.) - ८७.२०पुणे शहर (पू.) - ८५.५२पिंपरी चिंचवड - ९०.०१विभाग निहाय व श्रेणी निहाय उत्तीर्ण विद्यार्थी विभाग७५% व पुढे६०% व पुढे पुणे१२,७७६७,०५३नागपूर७,६०५४०,९१३औरंगाबाद११,८९९७०,०४४मुंबई३३,३७३८६,६२२कोल्हापूर६,५४३३५,८९७अमरावती८,८५५५०,०१९नाशिक५,४३९५४,२१०लातूर५,६६०२५,३५१कोकण१,९७८११,५५८काही वर्षांपासून राज्य मंडळाच्या निकालाच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत चालली होती. सीबीएसई बोर्डाप्रमाणे राबविलेल्या जात असलेल्या ८०/२० पॅटर्नमुळे कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सरसकट २० पैकी २० गुण दिले जात असल्याने निकाल फुगलेला दिसत होता. मात्र, यंदा प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी बहि:स्थ परीक्षकांची नियुक्ती केली. त्यामुळे बारावीच्या २०१६ च्या निकालात ४.६६ टक्क्यांनी घट झाली. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल चांगला लागावा, या हेतूने काही शिक्षकांकडून प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे गुण सढळ हाताने दिले जात होते. परिणामी विद्यार्थ्यांना १५ ते २० टक्के गुण सहज मिळत होते. त्यामुळेच निकालाची टक्केवारी वाढत चालली होती. मात्र, राज्य मंडळाने यंदा बारावीच्या परीक्षेसाठी रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बहि:स्थ परीक्षांची नियुक्ती केली होती. त्याचप्रमाणे पर्यावरण शिक्षण परीक्षेसाठीही बहि:स्थ शिक्षक नियुक्त करण्यात आले.त्यामुळे विद्यार्थ्यांना सढळ हाताने दिल्या जाणाऱ्या गुणांवर यंदा नियंत्रण आले. त्याचप्रमाणे गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या जात होत्या. त्यामुळे यंदा बारावीच्या निकालात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते.- गंगाधर म्हामणे, राज्य मंडळाचे अध्यक्ष