शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

८२ टक्के कोरडवाहूंना न्याय देणार

By admin | Updated: April 27, 2015 04:51 IST

दुष्काळी पुरंदरला न्याय देणारच, गुंजवणीचे पाणी आणणारच पण याचबरोबर राज्यात अडचणीत असणारे १९२ तालुके आहेत.

खळद : दुष्काळी पुरंदरला न्याय देणारच, गुंजवणीचे पाणी आणणारच पण याचबरोबर राज्यात अडचणीत असणारे १९२ तालुके आहेत. आघाडी सरकारच्या काळात हजारो कोटींचे घोटाळे झाले; पण सिंचन क्षेत्र मात्र १८ टक्के इतकेच राहिले, तर ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. सध्या येथील शेतकरी अडचणीत आहे. या लोकांना न्याय देण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक काम या पुढील काळात करणार असल्याचे राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.खळद येथे जलयुक्त शिवार अभियानअंर्तगत नाला खोलीकरण, २० लाख रुपये खर्चाचे गावठाण ते घोडकेमळा रस्ता डांबरीकरण, दशक्रिया विधी घाट या कामांचे भूमिपूजन तसेच, शाखा नूतनीकरण व नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेना तालुका प्रमुख पुरंदर दिलीप यादव, हवेली तालुका प्रमुख संदीप मोडक, युवासेना अध्यक्ष उमेश गायकवाड, उपतालुका प्रमुख कैलास कामथे, सुभाष गायकवाड, धीरज जगताप, रमेश इंगळे, नामदेव झुरंगे, मंडल कृषी अधिकारी मासाळ, कृषी सहायक संजीव किरकोळे, नंदकुमार कामथे, एकनाथ कामथे, संतोष कामथे, उत्तम कामथे, बबन कामथे, सुदाम कामथे, संजय कामथे, संदीप कामथे, राजू मुलाणी, शिवाजी कामथे, वसंत कामथे, दत्तात्रय कामथे, कैलास खळदकर, यशवंत इभाड, मंगेश कामथे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्थानिक नागरिक नंदकुमार कामथे यांनी चव्हाणवाडी-तेगोटेमाळ रस्ता पाच वर्षांत आश्वासन देऊनही आजपर्यंत पूर्ण झाला नाही, आता तरी तो पूर्ण करा अशी मागणी केली. जालिंदर काळे यांनी सूत्रसंचालन, तर अमित कामथे यांनी प्रास्ताविक तसेच नीलेश कामथे यांनी आभार मानले. (वार्ताहर)