शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

८२ टक्के कोरडवाहूंना न्याय देणार

By admin | Updated: April 27, 2015 04:51 IST

दुष्काळी पुरंदरला न्याय देणारच, गुंजवणीचे पाणी आणणारच पण याचबरोबर राज्यात अडचणीत असणारे १९२ तालुके आहेत.

खळद : दुष्काळी पुरंदरला न्याय देणारच, गुंजवणीचे पाणी आणणारच पण याचबरोबर राज्यात अडचणीत असणारे १९२ तालुके आहेत. आघाडी सरकारच्या काळात हजारो कोटींचे घोटाळे झाले; पण सिंचन क्षेत्र मात्र १८ टक्के इतकेच राहिले, तर ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. सध्या येथील शेतकरी अडचणीत आहे. या लोकांना न्याय देण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक काम या पुढील काळात करणार असल्याचे राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.खळद येथे जलयुक्त शिवार अभियानअंर्तगत नाला खोलीकरण, २० लाख रुपये खर्चाचे गावठाण ते घोडकेमळा रस्ता डांबरीकरण, दशक्रिया विधी घाट या कामांचे भूमिपूजन तसेच, शाखा नूतनीकरण व नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेना तालुका प्रमुख पुरंदर दिलीप यादव, हवेली तालुका प्रमुख संदीप मोडक, युवासेना अध्यक्ष उमेश गायकवाड, उपतालुका प्रमुख कैलास कामथे, सुभाष गायकवाड, धीरज जगताप, रमेश इंगळे, नामदेव झुरंगे, मंडल कृषी अधिकारी मासाळ, कृषी सहायक संजीव किरकोळे, नंदकुमार कामथे, एकनाथ कामथे, संतोष कामथे, उत्तम कामथे, बबन कामथे, सुदाम कामथे, संजय कामथे, संदीप कामथे, राजू मुलाणी, शिवाजी कामथे, वसंत कामथे, दत्तात्रय कामथे, कैलास खळदकर, यशवंत इभाड, मंगेश कामथे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्थानिक नागरिक नंदकुमार कामथे यांनी चव्हाणवाडी-तेगोटेमाळ रस्ता पाच वर्षांत आश्वासन देऊनही आजपर्यंत पूर्ण झाला नाही, आता तरी तो पूर्ण करा अशी मागणी केली. जालिंदर काळे यांनी सूत्रसंचालन, तर अमित कामथे यांनी प्रास्ताविक तसेच नीलेश कामथे यांनी आभार मानले. (वार्ताहर)