शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी प्रकल्पातील धरणात ८१.१५ टक्के पाणी

By admin | Updated: September 25, 2016 04:51 IST

जिल्ह्याबरोबर अहमदनगर, सोलापूर, बीड या जिल्ह्यांतील तहान भागविणाऱ्या कुकडी प्रकल्पात ८१.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात अवघा ४९.२२ टक्के

घोडेगाव : जिल्ह्याबरोबर अहमदनगर, सोलापूर, बीड या जिल्ह्यांतील तहान भागविणाऱ्या कुकडी प्रकल्पात ८१.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात अवघा ४९.२२ टक्के पाणीसाठा होता. या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे थोडीफार कमी झालेली पाण्याची पातळी भरून निघाल्याने या वर्षी आशादायी वातावरण आहे.कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नूर यांच्याशी सध्याचा पाणीसाठा व नियोजन याबाबत चर्चा केली असता, कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये चांगला पाऊस पडत असल्याने धरणात उत्तम साठा झाला आहे. मात्र, कुकडी प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या पूर्व भागात अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही. येथील तलाव अजूनही भरलेले नाहीत. याच पूर्व भागात पाण्याची मागणी सर्वांत जास्त असते. त्यामुळे कुकडी प्रकल्प जरी भरलेला असला, तरी मागणीही विस्तृत आहे. याचा पाण्यावर ताण येणार आहे. मागील वर्षी ५० टक्के पाणीसाठा असताना चांगले नियोजन करून लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. त्याप्रमाणे याही वर्षी उत्तम नियोजन करून शेवटच्या माणसापर्यंत पाणी देण्याचे नियोजन आम्ही करणार आहोत. या वर्षी सर्वांत मोठे आव्हान हे नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्याचे आहे. मागील तीन ते चार वर्षांचा विचार करता आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये परतीचे मोठे पाउस पडले आहेत. (वार्ताहर)- कुकडी प्रकल्पातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या डिंभे धरणात १०० टक्के, तर जुन्नर तालुक्यातील वडज धरणात ९९.४२ टक्के, पिंपळगाव जोगा धरणात ८२.६० टक्के, माणिकडोह धरणात ७०.२३ टक्के साठा झाला आहे. तर, यडगाव साठवण धरणात २५.३० टक्के पाणी आहे. तसेच, शिरूर तालुक्यातील घोड धरणात ९६.६७ टक्के, चिल्हेवाडी धरणात ७१.७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.