शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

विभागातील सीबीएसईचे ७६ हजार विद्यार्थी परीक्षेविना पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:11 IST

सीबीएसईने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या लेखी ...

सीबीएसईने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, राज्य शासनानेसुद्धा दहावीच्या परीक्षा रद्द कराव्यात,‌ अशी भूमिका घेणारा पालकांचा एक गट आहे. दहावीची‌ म्हणजे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवासाचा पहिला टप्पा आहे. त्यामुळे परीक्षा न दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे योग्य नाही, असे मानणारा पालकांचा दुसरा गट आहे. मागील वर्षी सीबीएसईच्या ७६ हजार विद्यार्थ्यांनी पुणे विभागातून नोंदणी केली होती. या वर्षीसुद्धा ७६ हजारांच्या आसपास विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

राज्य शासनाने सीबीएसई‌प्रमाणे निर्णय घेऊ नये, असे स्पष्ट मत राज्यातील शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले. तसेच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सुध्दा याबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल,असे सांगितले आहे. त्यामुळे‌ दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, सर्व विद्यार्थ्यांनी याबाबत विचार न करता अभ्यास सुरू ठेवावा, असे राज्य मंडळाच्या ‌अधिकाऱ्याकडून सांगितले जात आहे.

-------------

दहावीची २०२० मध्ये परीक्षा दिलेल्या पुणे विभागातील सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी

नोंदणीकृत विद्यार्थी - ७६,०८०

मुले -४४,४१८

मुली- ४०,९६४

प्रविष्ट झालेले विद्यार्थी -७५,९७०

मुले -४४,३५५

मुली- ३१,६१५

उत्तीर्ण झालेले विद्यार्थी -७४,४८५

मुले -४३,२९७

मुली- ३१,१८८

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची टक्केवारी - ९८.०५

मुले - ९७.६१

मुली -९८.६५

--------------

दहावीची परीक्षा घेणे आवश्यक असले तरी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे सीबीएसई प्रमाणे राज्य शासनाने एस एस सी बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात. - मिलिंद शिंदे, पालक

--------------------

दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतरच शासनाने परीक्षा घ्यावी.परीक्षा‌ रद्द करण्याची घाई करू नये.विद्यार्थांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करणे योग्य नाही.

- शैलेश जौंजाळ, पालक