शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

‘कुकडी’त ७३.१३ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:50 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील सर्व धरणांमध्ये सरासरी ७३़ १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील सर्व धरणांमध्ये सरासरी ७३़ १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १0 टक्के पाणीसाठा कमी आहे. डिंभा आणि वडज या धरणांमधून ७.३ टीएमसी पाणी आतापर्यंत नदी व कालव्यात सोडण्यात आलेले आहे़, अशी माहिती माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ १ चे कार्यकारी अभियंता जी़ बी़ नन्नोर व शाखाधिकारी प्रकाश मांडे यांनी दिली.गेल्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिली आहे. मात्र आदिवासी पट्ट्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पातळीत काही का प्रमाणात वाढ होत आहे. डिंभा, वडज व येडगाव धरण हे भरलेले होते़ परंतु या धरणातील नदी व कालव्यात पाणी सोडण्यात आल्याने वडज व येडगाव धरणाची क्षमता कमी झाली आहे़ तीनही धरणांमिळून ७३२४ द़ ल़ घ. फू. पाणीसाठा नदी व कालव्यातून सोडण्यात आले आहे़ डिंभा धरण मात्र पूर्ण क्षमतेने भरलेले आहे़वडज धरणात १ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़. १ जूनपासून ५३९ मि.मी. पाऊस झाला आहे़ या धरणातून येडगाव धरणात १६0 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे़ मीना नदीत १४६९ दलघफू पाणी सोडण्यात आलेले आहे. माणिकडोह या धरणात ६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ १ जूनपासून ७९६ मिमी पाऊस झाला असून, २४ तासांत ७ मि.मी. पाऊ स झाला आहे़ पिंपळगाव जोगा धरणात २ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ १ जूनपासून ८२७ मिमी पाऊस झाला असून, २४ तासांत ३ मि़ मी पाऊस झाला आहे़ चिल्हेवाडी धरणात 0.६२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ १ जूनपासून ६७३ मि़ मी. पाऊस झाला आहे़ तसेच घोड या धरणात ४़ ५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ १ जूनपासून ९७ मिमी पाऊस झाला आहे़ या धरणात वडज धरणातून मीना नदीद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धरणाचा पाणीसाठा वाढलेला आहे़डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि़ १ जूनपासून ९६९ मि़ मी. पाऊस झाला असून, २४ तासांत ४ मि़ मी पाऊस झाला आहे. या धरणातून येडगाव धरणात ५५0 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे़, तर उजव्या डावा कालव्यात ३00 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे़ दि़ २६ जुलैपासून विसर्ग सुरू असून आतापर्यंत १२९६ द़ ल़ घ. फू. पाणी या धरणातून विसर्ग करण्यात आले आहे़ घोड ब्रँच व मीना कालव्याला ३५0 दलघफू पाणी सोडण्यात आलेले आहे़ येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि़ १ जूनपासून ६३६ मि़ मी पाऊस झाला असून, २४ तासांत २ मिमी पाऊ स झाला आहे़ या धरणातून कुकडी कालव्यात ३५0५ दलघफूपाणी सोडण्यात आलेले आहे, तर कुकडी नदीत १८७५ दलघफू पाणी सोडण्यात आलेले आहे़