शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बेवारस ७०० वाहने १५ दिवसांत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:18 IST

शहरात विविध भागांत सार्वजनिक ठिकाणी बंद पडलेली तब्बल ७०० बेवारस वाहने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पंधरा दिवसांत जप्त केली आहेत.

पुणे : शहरात विविध भागांत सार्वजनिक ठिकाणी बंद पडलेली तब्बल ७०० बेवारस वाहने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पंधरा दिवसांत जप्त केली आहेत. यामध्ये सर्वाधिक ३७१ दुचाकी गाड्यांचा समावेश आहे. जप्त केलेली वाहने सोडविण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे. त्यानंतर लिलाव करून सर्व वाहने स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.पंधरा वर्षांपेक्षा अधिक जुनी तब्बल एक लाखांपेक्षा अधिक दुचाकी व चारचाकी वाहने सध्या शहरामध्ये आहेत. आरटीओच्या नियमानुसार संबंधित वाहनमालकांनी सर्व वाहने स्क्रॅप करणे आवश्यक आहे. परंतु, ते स्क्रॅप न करता शहरातील सार्वजनिक जागांमध्ये, घराबाहेर रस्त्यांवर वाहने सोडण्यात आली आहेत. यामध्ये अनेक वाहनमालकांकडे वाहन स्क्रॅपमध्ये काढण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने बेवारसपणे सोडण्यात येत असल्याचे समोर आले आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर अभियानातंर्गत या बेवारस वाहनांबाबत अनेक तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या आहेत. शहरामध्ये हजारो बेवारस वाहने रस्त्यांवर गेली अनेक वर्षे पडून असल्याचे पाहणीमध्ये समोर आले. परंतु पालिका प्रशासनाकडे उचलेली वाहने कुठे टाकायची, असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर होता. तसेच एवढी वाहने उचलण्यासाठी आवश्यक क्रेन व अन्य यंत्रणादेखील पालिकेकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे बºयाच कालावधीपासून सार्वजनिक जागांवर आणि रस्त्यांवर बंद अवस्थेत पडून असलेली ही वाहने वाहतुकीसाठी अडथळे ठरत आहेत. त्यातच या वाहनाच्या वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या वाहनामुळे रस्त्यावर होत असलेल्या वाहतूककोंडीची वेगळीच समस्या आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरातील बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु स्वच्छ शहर अभियानामध्ये यामुळे महापालिकेच्या गुणकांवर परिणाम होत असल्याने या बेवारस वाहनांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली.दंड भरून सोडविता येणार आपले वाहनया कारवाईत जप्त केलेल्या गाड्या घेऊन जाण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. यामध्ये दोनचाकी गाड्यांसाठी १ हजार रुपये, तीनचाकीसाठी १0 हजार रुपये, चारचाकीसाठी १५ हजार रुपये, सहाचाकीसाठी २0 हजार रुपये आणि त्यापेक्षा मोठ्या गाड्यांसाठी २५ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला असून, त्यानंतर या गाड्यांचा नियमानुसार लिलाव केला जाईल. ज्यामुळे महापालिकेला उत्पन्न मिळू शकणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.>कारवाईत जप्त केलेली वाहनेशहराच्या विविध भागांत सार्वजनिक ठिकाणी बेवारस पडलेली सुमारे ७०० वाहने प्रशासनाने जप्त केली आहेत. यामध्ये ३७१ दुचाकी गाड्या, ६६ तीनचाकी गाड्या, २५५ चारचाकी आणि अन्य वाहनांचा समावेश आहे. या सर्व वाहनांचा एका महिन्यात लिलाव करून स्कॅ्रपमध्ये काढण्यात येणार आहे. तसेच ही मोहीम पुढेदेखील सुरु ठेवण्यात येणार असल्याचे विभागप्रमुख माधव जगताप यांनी स्पष्ट केले.