शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

बेवारस ७०० वाहने १५ दिवसांत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:18 IST

शहरात विविध भागांत सार्वजनिक ठिकाणी बंद पडलेली तब्बल ७०० बेवारस वाहने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पंधरा दिवसांत जप्त केली आहेत.

पुणे : शहरात विविध भागांत सार्वजनिक ठिकाणी बंद पडलेली तब्बल ७०० बेवारस वाहने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पंधरा दिवसांत जप्त केली आहेत. यामध्ये सर्वाधिक ३७१ दुचाकी गाड्यांचा समावेश आहे. जप्त केलेली वाहने सोडविण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे. त्यानंतर लिलाव करून सर्व वाहने स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.पंधरा वर्षांपेक्षा अधिक जुनी तब्बल एक लाखांपेक्षा अधिक दुचाकी व चारचाकी वाहने सध्या शहरामध्ये आहेत. आरटीओच्या नियमानुसार संबंधित वाहनमालकांनी सर्व वाहने स्क्रॅप करणे आवश्यक आहे. परंतु, ते स्क्रॅप न करता शहरातील सार्वजनिक जागांमध्ये, घराबाहेर रस्त्यांवर वाहने सोडण्यात आली आहेत. यामध्ये अनेक वाहनमालकांकडे वाहन स्क्रॅपमध्ये काढण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने बेवारसपणे सोडण्यात येत असल्याचे समोर आले आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर अभियानातंर्गत या बेवारस वाहनांबाबत अनेक तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या आहेत. शहरामध्ये हजारो बेवारस वाहने रस्त्यांवर गेली अनेक वर्षे पडून असल्याचे पाहणीमध्ये समोर आले. परंतु पालिका प्रशासनाकडे उचलेली वाहने कुठे टाकायची, असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर होता. तसेच एवढी वाहने उचलण्यासाठी आवश्यक क्रेन व अन्य यंत्रणादेखील पालिकेकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे बºयाच कालावधीपासून सार्वजनिक जागांवर आणि रस्त्यांवर बंद अवस्थेत पडून असलेली ही वाहने वाहतुकीसाठी अडथळे ठरत आहेत. त्यातच या वाहनाच्या वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या वाहनामुळे रस्त्यावर होत असलेल्या वाहतूककोंडीची वेगळीच समस्या आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरातील बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु स्वच्छ शहर अभियानामध्ये यामुळे महापालिकेच्या गुणकांवर परिणाम होत असल्याने या बेवारस वाहनांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली.दंड भरून सोडविता येणार आपले वाहनया कारवाईत जप्त केलेल्या गाड्या घेऊन जाण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. यामध्ये दोनचाकी गाड्यांसाठी १ हजार रुपये, तीनचाकीसाठी १0 हजार रुपये, चारचाकीसाठी १५ हजार रुपये, सहाचाकीसाठी २0 हजार रुपये आणि त्यापेक्षा मोठ्या गाड्यांसाठी २५ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला असून, त्यानंतर या गाड्यांचा नियमानुसार लिलाव केला जाईल. ज्यामुळे महापालिकेला उत्पन्न मिळू शकणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.>कारवाईत जप्त केलेली वाहनेशहराच्या विविध भागांत सार्वजनिक ठिकाणी बेवारस पडलेली सुमारे ७०० वाहने प्रशासनाने जप्त केली आहेत. यामध्ये ३७१ दुचाकी गाड्या, ६६ तीनचाकी गाड्या, २५५ चारचाकी आणि अन्य वाहनांचा समावेश आहे. या सर्व वाहनांचा एका महिन्यात लिलाव करून स्कॅ्रपमध्ये काढण्यात येणार आहे. तसेच ही मोहीम पुढेदेखील सुरु ठेवण्यात येणार असल्याचे विभागप्रमुख माधव जगताप यांनी स्पष्ट केले.