शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वीस गुंठ्यांत घेतला ७० टन ऊस , बोरी बुद्रुकमध्ये प्रयोग : खर्च वजा जाता दीड लाख रुपयांचा नफा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 02:52 IST

बोरी बुद्रुक येथील संपत बबन कोरडे या तरुण शेतकºयाने २० गुठ्यांत २६५ या उसाच्या वाणाचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यातून चांगल्या प्रकारचा नफा मिळवला आहे.

- राजेश कणसे  राजुरी : बोरी बुद्रुक येथील संपत बबन कोरडे या तरुण शेतकºयाने २० गुठ्यांत २६५ या उसाच्या वाणाचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यातून चांगल्या प्रकारचा नफा मिळवला आहे.एका उसाला २० ते २५ टिपरे असतात. परंतु कोरडे यांनी घेतलेल्या एका उसाला साधारण ३०-३५ टिपरे आली आहेत. त्यांची चांगल्या वाढ देखील झाली असून, वजन देखील चांगले भरत आहे. आतापर्यंत विघ्नहर साखर कारखाना क्षेत्रामध्ये ऊस असलेल्या शेतकºयांनी एकरी शंभर टन ऊस काढला आहे. परंतु कोरडे यांनी अवघ्या वीस गुंठ्यांत (अर्धा एकर) सत्तर ते पंच्चाहत्तर टन उसाचे उत्पादन अवघ्या दहा महिन्यातच काढले आहे. कारण उसाच्या एका पिकाला साधारन पंधरा ते सोळा महिने लागत असतात. या पिकातून त्यांना खर्च वजा जाता दीड लाख रूपयांचा नफा मिळणार आहे. कृषीतज्ज्ञ रूपेश डेरे, विघ्नहर साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी गोपिनाथ औटी, संदीप जाधव, महादू जाधव यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) संपत बबन कोरडे या तरूणाचे शिक्षण अ‍ॅग्री डिप्लोमा झाले आहे. त्यांना नोकरीतून चांगला पगार मिळत असून, केवळ शेतीची आवड असल्याने या नोकरीवर पाणी सोडले वे शेती करू लागले. त्यांनी गावातील चारंगबाबा सेवा ट्रस्टची असलेली जमीन तीन वर्षांसाठी खंडाने घेतली.यामध्ये कोरडे यांनी २० गुठ्यांत ऊस लावण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी सरूवातीला ताग पेरला. नंतर हा ताग तीन महिन्यानंतर मोठा झाल्यावर गाडून टाकला.चार ट्रॉली शेणखत पांगवले हा ताग गाडल्यानंतर टॅक्टरने साडेचार फुटाची सरी काढली. त्यात दोन फुटाच्या अंतरावर एक डोळा पध्दत २६५ या जातीच्या वानाची उसाची लागवड केली. संपूर्ण २० गुठांच्या क्षेत्राला ठिबक पध्दतीने पाणी दिले. तसेच महिना झाल्यानंतर सरी फोडून उसाच्या बुडकापाशी चांगल्या प्रकारे माती लावली. तसेच त्यांनी यासाठी शेणखत पोटॅश १८४६ ही खते वापरली.ऊस लागवडीपासून आतापर्यंत जवळपास फक्त ३६ हजाररुपये खर्च आलेला आहे. विशेष म्हणजे त्यांनी अतिशय कमी दिवसांत म्हणजे फक्त दहा महिण्यातच हा ऊस तुटायला आला आहे.