शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

भोर तालुक्यात ६७ टक्के मतदान

By admin | Updated: February 22, 2017 02:07 IST

भोर तालुक्यातील २२२ मतदान केंद्रांपैकी ६ केंद्रांतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे २१६ केंद्रांवरच मतदान

भोर : भोर तालुक्यातील २२२ मतदान केंद्रांपैकी ६ केंद्रांतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे २१६ केंद्रांवरच मतदान झाले. तालुक्यातील सर्व केंद्रांवर सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत १२ टक्के, ९.३० ते ११.३० पर्यंत २७ टक्के, ११.३० ते १.३० पर्यंत ५१ टक्के आणि ३.३० वाजता ५६ टक्के मतदान झाले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ६७ टक्के मतदानाचा अंदाज आहे. वीसगावमधील नेरे, खानापूर, बाजारवाडी, बालवडी, हातनोशी, उत्रौली, तर कर्नावड, आंबवडे, रायरी, भोलावडे, हातवे, किकवी या गावात मतदारांनी रांगा लावल्या होत्या. निवडणुकीत कोणताच अनुचित प्रकार घडू नये, म्हणून नसरापूर, भोलावडे, केळवडे, हातवे, उत्रौली, नेरे, बालवडी, किकवी या गावात अधिक प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाटघर धरण भागात नागरी सुविधा झाल्या नसल्याने पाच गावांतील १३३० मतदारांनी मतदान केले नाही. भुतोंडे मतदान केंद्रावर (०), खुलशी (०), गृहिणी (०), चांदावणे (०), कुंबळे व बोपे (०) टक्के मतदान झाले. या भागातील फक्त डेरे गावात ९५ मतदान झाले. येथील खिळदेववाडीने मतदान केले नाही. आदिवासी महादेव कोळी समाजाने  विविध मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे तहसीलदार वर्षा  शिंगण, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, गटविकास अधिकारी संजीव गायकवाड यांनी कारी, कोळेवाडीत जाऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. परंतु मतदारांनी मतदान केले नाही. धानवली गावातील मतदान केंद्रावर (०), तर कारी कोळेवाडी सांगवी वे. खो, नांदघुर  पसुरे जयतपाड या गावात महादेव कोळी समाजाच्या लोकांनी मतदानात भाग घेतला नाही. सुमारे ४५० मतदारांनी बहिष्कार टाकला. (वार्ताहर)