शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

६० हजारांवर मराठ्यांची उपस्थिती

By admin | Updated: September 26, 2016 01:33 IST

पुण्यातील मराठा मूक मोर्चासाठी सुमारे ६० हजारांपेक्षा मराठ्यांची उपस्थिती असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. मोर्चात जास्तीत जास्त पुरंदर तालुक्याचा सहभाग

जेजुरी : पुण्यातील मराठा मूक मोर्चासाठी सुमारे ६० हजारांपेक्षा मराठ्यांची उपस्थिती असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. मोर्चात जास्तीत जास्त पुरंदर तालुक्याचा सहभाग राहावा म्हणून तालुक्यातील संयोजक गेले १५ दिवसांपासून नियोजन करीत होते. सासवड, जेजुरी या प्रमुख शहराव्यातिरिक्त गावागावांतून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्याला गावागावांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. तालुक्यातील अनेक मराठा समाजबांधवांनी कालपासूनच पुण्यात जायला सुरुवात केली होती. आज सकाळी ६ वाजतापासून जेजुरी-सासवड येथून मराठाबांधव पुण्याकडे कूच करीत होते. सासवड येथून मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठाबांधवांसाठी संयोजकांनी ४० एसटी बस, ३० पीएमटी बस, २५ खासगी बस, १० ट्रक, ४०० जीपगाड्या आणि सुमारे ८००० दुचाकींच्या अधिकृत नोंदी केलेल्या होत्या. याशिवाय तालुक्यातील प्रत्येक गावातून उत्स्फूर्तपणे मराठाबांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी गेला होता. पुरंदर तालुक्यातील समाजबांधवांसाठी पुण्यातील गुलटेकडी, मार्केट यार्ड परिसरात वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.पुरंदरकरांनी हा संपूर्ण परिसर व्यापून टाकला होता. तालुक्यतील शाळा-महाविद्यालयांतील युवक-युवतींची मोठी संख्या दिसत होती. मोर्चाचा प्रारंभ करण्यासाठी डेक्कन येथील संभाजीमहाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालणे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातून १५ भगिनींची निवड केली होती.इंदापूरमधून ८० बस; दोन हजार चारचाकीइंदापूर : पुणे शहरात झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी इंदापूर तालुक्यातून सुमारे ७० हजार जण गेले होते. एसटी बसने जाणाऱ्यांबरोबरच ८० बस आणि दोन हजार चारचाकी वाहनांतून लोक मोर्चाला गेले होते, अशी माहिती तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.ते म्हणाले, की राजकीय पक्ष, संघटना, आपसातील मतभेद बाजूला ठेवून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सर्व जण एकत्र आले होते. तालुक्यातील प्रत्येक गावातून किमान दहा गाड्या निघाल्या होत्या. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोलनाक्यावरून ४० हजार गाड्या गेल्याची नोंद आहे. मराठा समाजाच्या रास्त मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक नागरिक मोर्चात सामील झाले होते.