शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या ३९७ जागांसाठी ६० हजार अर्ज

By admin | Updated: March 22, 2017 20:50 IST

पुणे शहर आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, कारागृह आणि लोहमार्ग विभागातील ३९७ जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी तब्बल ६० हजार तरुणांनी

 ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22 - राज्यभरामध्ये बुधवारपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, पुणे शहर आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, कारागृह आणि लोहमार्ग विभागातील ३९७ जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी तब्बल ६० हजार तरुणांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवाजीनगर मुख्यालय, ग्रामीण पोलीस मुख्यालयासह लोहमार्ग मुख्यालयामध्ये ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 
पोलीस भरतीसाठी राज्यभरामधून आॅनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणांनुसार त्यांना संबंधित केंद्रांवर भरतीसाठी जाण्याचे मेसेज आणि माहिती पाठवण्यात आलेली होती. पुणे शहर आयुक्तालयासाठी एकूण २३९ पदे भरण्यात येणार असून त्यासाठी ३५ हजारांच्यावर अर्ज आलेले आहेत. तर ग्रामीण पोलीस आणि कारागृह पोलिसांची भरती प्रक्रिया एकत्रच राबवली जात आहे. ग्रामीण पोलिसांची ८० आणि कारागृहाच्या ४५ जागांसाठी पाषाण येथील मुख्यालयामध्ये प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी एकूण १६ हजार २४१ अर्ज आले आहेत. तर लोहमार्ग पोलिसांची भरती प्रक्रिया खडकी मुख्यालयात सुरु असून, ३३ जागांसाठी साडे आठ हजार अर्ज आले आहेत. शहरातील भरतीसाठी पहिल्या दिवशी बोलावण्यात आलेल्या १ हजार उमेदवारांपैकी ३४८ जण गैरहजर राहीले. तर ८२ जण अपात्र ठरले आहेत. तर ग्रामीण आणि कारागृह भरतीसाठी आलेल्या ७११ जणांपैकी ६८३ जण पात्र ठरले. तर लोहमार्ग पोलीस दलाच्या भरतीसाठी ३७२ जण उपस्थित राहीले होते.
आयुक्तालयाच्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामध्ये उमेदवारांसाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच त्यांना स्वच्छतागृहांची आणि पाण्याची सुविधाही देण्यात आली आहे. फळांचे स्टॉल यावेळी लावण्यात आले असून पोलीस कॅन्टीनमधून ते खाद्य पदार्थ विकत घेऊन खाऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अरविंद चावरीया यांनी दिली. भरती केंद्रावर डॉक्टरांचे पथक नेमण्यात आलेले असून अत्यावश्यक सुविधांसह सुसज्ज रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तब्बल ८०० पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस भरतीसाठी नेमण्यात आले आहेत. उमेदवारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून शारीरिक क्षमता चाचणी तसेच धावणे स्पर्धा ही सकाळी सहा ते साडेनऊच्या दरम्यान घेण्यात येत असल्याचे चावरीया यांनी सांगितले.