शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

जिल्ह्यात ६० लाख ६० हजार टन उसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2016 00:41 IST

जिल्ह्यातील ११ सहकारी व ५ खासगी साखर कारखान्यांनी मिळून ७० टक्के ऊसगाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. येणाऱ्या दोन महिन्यांत उर्वरित ३० टक्के ऊसगाळपासाठी कारखान्यांची

सोमेश्वरनगर : जिल्ह्यातील ११ सहकारी व ५ खासगी साखर कारखान्यांनी मिळून ७० टक्के ऊसगाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. येणाऱ्या दोन महिन्यांत उर्वरित ३० टक्के ऊसगाळपासाठी कारखान्यांची धुराडी रात्रंदिवस धडधडत आहेत. आत्तापर्यंत कारखान्यांनी मिळून ६० लाख ६० हजार ३८ टन उसाचे गाळप करून, ६६ लाख ४ हजार ६०५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांपुढे चालू हंगामात ९० लाख टन ऊसगाळपाचा अंदाज होता. त्यापैकी सर्व कारखान्यांनी मिळून ६० मे. टनाचे गाळप केले आहे. मात्र, सहकारातील तज्ज्ञांनी ९० लाख टनाचा केलेला अंदाज हा पाण्याच्या कमतरतेअभावी ८० लाख टनावर येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अजून २० लाख टन ऊस शेतात उभा आहे. धरणक्षेत्रातही पावसाचे प्रमाणे अत्यल्प आहे. मात्र, आतापर्यंत सुरू असलेले कालवे बंद झाले आहेत. मात्र, अनेक कारखान्यांनी पाण्याची सोय केली आहे. छोटे मोठे साठवण तलाव बांधले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांच्या सर्व उसाचे गाळप पूर्ण करतील. ऊसगाळपात आणि साखर उताऱ्यात खासगी कारखान्यांनी बाजी मारली आहे, तर ९० टक्के २६५ उसाचे गाळप करून सोमेश्वर कारखान्याने सहकारी साखर कारखान्यात साखर उताऱ्यात बाजी मारली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी थंडी अधिक काळ टिकल्याने कारखान्यांना अजूनही साखर उतारे चांगले आहेत. नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान समजल्या जाणाऱ्या ‘हाय रिकव्हरी पिरीयड’मध्ये जिल्ह्यातील १२ कारखाने साखर उताऱ्यात ११ टक्क्यांच्या पुढे गेले आहेत. चालू हंगामात अनेक कारखान्यांपुढे दुष्काळाचे सावट उभे आहे. त्यामुळे पाण्याच्या कमतरतेअभावी उसाचे गाळप लवकर संपविणे हे कारखान्यांपुढे मोठे संकट आहे.दुष्काळी भागातील ऊस संपविण्यासाठी शेतकी विभाग यंत्रणा रात्रंदिवस झटत आहे. अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिरायती भगाातील ऊस संपविण्यासाठी संचालक मंडळाने परवानगी दिल्या आहेत.