शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

६0 बोटी जाळल्या!

By admin | Updated: January 7, 2015 22:54 IST

महिनाभरापासून दौैंड तालुक्यात वाळू माफियांविरोधात महसूल विभागाची कारवाई सुरूच असून, आतापर्यंत सुमारे ६0 बोटी पथकाने जाळल्या व २0 लाखांची दंडवसुली केली आहे.

महिनाभरापासून दौैंड तालुक्यात वाळू माफियांविरोधात महसूल विभागाची कारवाई सुरूच असून, आतापर्यंत सुमारे ६0 बोटी पथकाने जाळल्या व २0 लाखांची दंडवसुली केली आहे. तरीही उपसा सुरू असल्याने चित्र आहे. भीमापात्र वाळू माफियांनी पुरते पोखरले आसून, हैदोस घातला आहे.राजेगाव-खानोट्यात ७ बोटीवंर कारवाईराजेगाव : खानोटा (दौंड) येथील भीमा नदीच्यापात्रात बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या ७ बोटी महसूलच्या पथकाने आज जिलेटिनने जाळल्या असल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली. वाळूच्या अवजड वाहतुकीमुळे रस्तेही खराब होत चालले आहेत. तर, ग्रामस्थांना आणि ऊसतोडणी मजुरांना वाळू व्यावसायिकांकडून दमदाटी केली जाते. अशा आशयाच्या तक्रारी महसूल विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार महसूल विभागाने आजची कारवाई केली.या कारवाईत तहसीलदार उत्तम दिघे, नायब तहसीलदार सुनील शेळके, मंडलाधिकारी शंकर स्वामी, मोहन कांबळे यांच्यासह गावकामगार तलाठी सहभागी झाले होते. गेल्या आठ दिवसांपासून या भागात वाळूमाफियांच्या बोटी जाळल्या जात आहेत. नदीकाठी उभ्या असलेल्या बोटींचीदेखील विल्हेवाट लावली जात असल्याने काही वाळूमाफियांनी फायबर आणि यांत्रिकी बोटी नदीलगतच्या ओढ्यात आणि झाडाझुडपात लपवून ठेवल्या होत्या. तसेच या होड्यांवर काटेरी झुडपे तोडून टाकले होती. त्यामुळे होड्या दिसून येत नव्हत्या; मात्र महसूल खात्याने याचा शोध घेऊन या बोटींची विल्हेवाट लावली. या कारवाईमुळे वाळूमाफियांनी चांगलीच धास्ती घेतली असून, अशाच कारवाया कायम होत राहिल्या, तर भविष्यात बेकायदा वाळूचोरी बंद होण्यास आळा बसेल, असे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. बेकायदा वाळूउपशावर कारवाई केली जात आहे. भविष्यातही ही कारवाई थांबणार नाही. तसेच नदीकाठच्या शेतकऱ्यांनी वाळूमाफियांच्या दादागिरीला भीक घालू नये. यापुढे कोणीही वाळूमाफिया दादागिरी करीत असेल, तर त्याची रीतसर तक्रार महसूल खात्याकडे करावी आणि महसूल खाते त्याची तक्रार पोलिसांकडे करून ग्रामस्थांना न्याय देण्याचे काम करेल- उत्तम दिघे , तहसीलदार, दौैंड तालुका