शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

६0 बोटी जाळल्या!

By admin | Updated: January 7, 2015 22:54 IST

महिनाभरापासून दौैंड तालुक्यात वाळू माफियांविरोधात महसूल विभागाची कारवाई सुरूच असून, आतापर्यंत सुमारे ६0 बोटी पथकाने जाळल्या व २0 लाखांची दंडवसुली केली आहे.

महिनाभरापासून दौैंड तालुक्यात वाळू माफियांविरोधात महसूल विभागाची कारवाई सुरूच असून, आतापर्यंत सुमारे ६0 बोटी पथकाने जाळल्या व २0 लाखांची दंडवसुली केली आहे. तरीही उपसा सुरू असल्याने चित्र आहे. भीमापात्र वाळू माफियांनी पुरते पोखरले आसून, हैदोस घातला आहे.राजेगाव-खानोट्यात ७ बोटीवंर कारवाईराजेगाव : खानोटा (दौंड) येथील भीमा नदीच्यापात्रात बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या ७ बोटी महसूलच्या पथकाने आज जिलेटिनने जाळल्या असल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली. वाळूच्या अवजड वाहतुकीमुळे रस्तेही खराब होत चालले आहेत. तर, ग्रामस्थांना आणि ऊसतोडणी मजुरांना वाळू व्यावसायिकांकडून दमदाटी केली जाते. अशा आशयाच्या तक्रारी महसूल विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार महसूल विभागाने आजची कारवाई केली.या कारवाईत तहसीलदार उत्तम दिघे, नायब तहसीलदार सुनील शेळके, मंडलाधिकारी शंकर स्वामी, मोहन कांबळे यांच्यासह गावकामगार तलाठी सहभागी झाले होते. गेल्या आठ दिवसांपासून या भागात वाळूमाफियांच्या बोटी जाळल्या जात आहेत. नदीकाठी उभ्या असलेल्या बोटींचीदेखील विल्हेवाट लावली जात असल्याने काही वाळूमाफियांनी फायबर आणि यांत्रिकी बोटी नदीलगतच्या ओढ्यात आणि झाडाझुडपात लपवून ठेवल्या होत्या. तसेच या होड्यांवर काटेरी झुडपे तोडून टाकले होती. त्यामुळे होड्या दिसून येत नव्हत्या; मात्र महसूल खात्याने याचा शोध घेऊन या बोटींची विल्हेवाट लावली. या कारवाईमुळे वाळूमाफियांनी चांगलीच धास्ती घेतली असून, अशाच कारवाया कायम होत राहिल्या, तर भविष्यात बेकायदा वाळूचोरी बंद होण्यास आळा बसेल, असे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. बेकायदा वाळूउपशावर कारवाई केली जात आहे. भविष्यातही ही कारवाई थांबणार नाही. तसेच नदीकाठच्या शेतकऱ्यांनी वाळूमाफियांच्या दादागिरीला भीक घालू नये. यापुढे कोणीही वाळूमाफिया दादागिरी करीत असेल, तर त्याची रीतसर तक्रार महसूल खात्याकडे करावी आणि महसूल खाते त्याची तक्रार पोलिसांकडे करून ग्रामस्थांना न्याय देण्याचे काम करेल- उत्तम दिघे , तहसीलदार, दौैंड तालुका