शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भोर तालुक्यातील ५२ गावांनी कोरोनाला अडविले वेशीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:11 IST

भोर तालुक्यात १९६ गाव वाडया वस्त्या असून १५५ ग्रामपंचायती आहेत. भोर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुभाव वाढत आहे. त्यामुळे भोर ...

भोर तालुक्यात १९६ गाव वाडया वस्त्या असून १५५ ग्रामपंचायती आहेत. भोर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुभाव वाढत आहे. त्यामुळे भोर शहरातील आणि ग्रामीण भागातील कोविड सेटरमधील बेड कमी पडत आहेत. अनेक ठिकाणी आँक्सीजनची आवस्था भयानक आहे. शासनाने अनेक निंबंध लावले आहेत मात्र तरीही शहरात आणि ग्रामीण भागात दररोज ९० ते ९२ कोरोना रुग्ण आढळत आहेत. ९२ जणाचा मृत्यू झालेला आहे. यामुळे लोकांसह प्रशासनाची चिंता वाढताना दिसत आहे. शासकीय कोविड सेंटरसह खाजगी दवाखान्यातही कोविड सेटर नविन सुरु केले आहेत. मात्र रुग्ण संख्या झपाटयाने वाढत असल्याने कोविड सेटर कमी पडत असून रोज नविन सेंटर वाढवावे लागत आहेत.

भोर तालुक्यातील १९६ पैकी १४४ गावात पुणे, मुंबई किवा बाहेरुन आलेले रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे यात एक पासून पाच पर्यत कोरोनाचा आकडा आहे. यातील अनेकजन उपचार घेऊन घरी आले आहेत. मात्र तालुक्यातील भाटघर धरण भागातील भुतोडेखोरे निरादेवघर धरण खोऱ्यातील हिर्डोशी खोरे आंबवडे भागातील काही गावे या दुर्गम डोंगरी भागातील ५२ गावात अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.

सध्या बाहेरगावी असलेल्या लोकांमुळे गावे रिकामी आहेत. मात्र भविष्यात बाहेर असलेले नागरिक गावात परत येण्यास सुरवात झालेली आहे. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव नसलेल्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो यासाठी प्रशासनाने आणी ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची खरी गरज आहे.

--

कोट

कामानिमित्त बाहेरगावी असलेले नागरीकांना गावात पुन्हा यायचे झाल्यास त्यांना प्रशासन व ग्रामपंचायतकडुन गावा बाहेरच होमक्वारंटाइन केले जाणार आहे. यामुळे गावात नव्याने कोरोनाचा शिरकाव होणार नाही.

-विशाल तनपुरे,

गटविकास अधिकारी पंचायत समिती भोर

--

चौकट -

दुर्गम डोंगरी गावे शहराचा संर्पक कमी त्यामुळे कोरोनाचा शिरकाव नाही

भोर तालुक्यातील भाटघर व निरादेवघर धरण भागातील बोपे कुंबळे खुलशी डेरे भांड्रावली तर निरादेवघर धरणा भागातील गुढे, निवगण, दुर्गाडी, कुड, अशिपी, शिळीब, हिर्डोशी भागातील लोकांचा आंबवडे भागातील काही गावे भोर शहरासी फारसा संर्पक नाही. कामानिमित्त बाहेर असलेले नागरिक क्वचीतच गावात येतात. यामूळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही येथे कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. मात्र भविष्यात बाहेरचे नागरिक गावात यायला सुरवात झाल्यास आणी रिकामे गावे पुन्हा भरायला लागल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.