शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘भीमा-पाटस’ला ५२ अर्ज अवैध

By admin | Updated: April 28, 2015 23:30 IST

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ३३0 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

दौंड : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ३३0 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दरम्यान, छाननीअंतर्गत ५२ अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी दिली. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या नियमानुसार २८-२ या कलमाच्या आधारे पिकवलेला संपूर्ण ऊस निवडणूकपूर्वीच्या पाच गळीत हंगामांपैकी लगतच्या सलग ३ हंगामांत कारखान्याला घालण्याचे बंधन ज्यांनी पाळले नाही, अशा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. उमेदवारी अर्जांची छाननी सोमवारी होती; परंतु ६२ अर्जांवर हरकती घेतल्यामुळे छाननी आणि निर्णय देण्यास विलंब झाला. दरम्यान, हरकत घेतलेल्या अर्जांवर मंगळवारी दुपारी सुनावणी झाली. यात मान्यवरांचे अर्ज बाद झाले आहेत. (वार्ताहर)मान्यवरांचे अर्ज बाद४भीमा-पाटस कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार राहुल कुल गटाच्या विरोधात सर्वपक्षीय एकत्रित पॅनल करण्याच्या हालचालींना सुरुवात झाली. परंतु या पॅनलचे प्रमुख आणि भीमा-पाटसचे माजी उपाध्यक्ष सत्त्वशील शितोळे यांचाच अर्ज बाद केल्यामुळे भीमा-पाटसच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराजीचा सूर होता. ४दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पोपटराव ताकवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब ढमढेरे, माजी पंचायत समिती सदस्य दौलत ठोंबरे, माजी पंचायत समिती सदस्य बबन रणवरे, पाटसचे माजी सरपंच योगेंद्र शितोळे, माणिकराव भागवत, शहाजी चव्हाण, नारायण आटोळे, शहाजी अवचर, नानासाहेब जेधे, अशोक खळदकर, वरवंडचे माजी सरपंच रामदास दिवेकर, सुभाष बोत्रे, विठ्ठल थोरात यांच्यासह मान्यवरांचे अर्ज अवैध झालेले आहेत. ४विरोधकांचे राजकीय दबावापोटी जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद करण्यात आला असल्याचा आरोप भीमा-पाटसचे माजी उपाध्यक्ष सत्त्वशील शितोळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ४दरम्यान, या निकालाच्या विरोधात साखर सहसंचालकाकडे तक्रार करण्यात येणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांनी निवडणुकीला घाबरून विरोधकांचे अर्ज रद्द करण्याचे षड्यंत्र रचले असल्याचे स्पष्ट करून शितोळे म्हणाले की, सभासदांना भाव नाही तर कामगारांना पगार नाही, अशा दुहेरी कचाट्यात राहुल कुल अडकलेले असून, निवडणुकीत जनता त्यांच्या बाजूने कौल देईल की नाही याबाबत त्यांना साशंकता आहे. त्यामुळे कुल यांनी राजकीय वापर करून विरोधकांचे अर्ज बाद केले. वास्तविक पाहता मी कारखान्याला सलग तीन वर्षे ऊस दिला आहे. ४यासंदर्भातील दाखला कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी मला दिलेला आहे. गट क्र. ५४ वरून माझ्या अर्जावर हरकत घेण्यात आली. त्या गटात चुकीच्या पद्धतीने गुऱ्हाळ दाखविण्यात आले आहे. ही चूक मी कारखाना व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर या गटातील ऊस चाऱ्यासाठी दिल्याच्या कारणावरून माझा अर्ज बाद केला आहे. तेव्हा कारखान्याने एफआरपी दिलेली नाही. यासंदर्भात लवकरच भीमा पाटसवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.