शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

‘भीमा-पाटस’ला ५२ अर्ज अवैध

By admin | Updated: April 28, 2015 23:30 IST

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ३३0 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

दौंड : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ३३0 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दरम्यान, छाननीअंतर्गत ५२ अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी दिली. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या नियमानुसार २८-२ या कलमाच्या आधारे पिकवलेला संपूर्ण ऊस निवडणूकपूर्वीच्या पाच गळीत हंगामांपैकी लगतच्या सलग ३ हंगामांत कारखान्याला घालण्याचे बंधन ज्यांनी पाळले नाही, अशा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. उमेदवारी अर्जांची छाननी सोमवारी होती; परंतु ६२ अर्जांवर हरकती घेतल्यामुळे छाननी आणि निर्णय देण्यास विलंब झाला. दरम्यान, हरकत घेतलेल्या अर्जांवर मंगळवारी दुपारी सुनावणी झाली. यात मान्यवरांचे अर्ज बाद झाले आहेत. (वार्ताहर)मान्यवरांचे अर्ज बाद४भीमा-पाटस कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार राहुल कुल गटाच्या विरोधात सर्वपक्षीय एकत्रित पॅनल करण्याच्या हालचालींना सुरुवात झाली. परंतु या पॅनलचे प्रमुख आणि भीमा-पाटसचे माजी उपाध्यक्ष सत्त्वशील शितोळे यांचाच अर्ज बाद केल्यामुळे भीमा-पाटसच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराजीचा सूर होता. ४दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पोपटराव ताकवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब ढमढेरे, माजी पंचायत समिती सदस्य दौलत ठोंबरे, माजी पंचायत समिती सदस्य बबन रणवरे, पाटसचे माजी सरपंच योगेंद्र शितोळे, माणिकराव भागवत, शहाजी चव्हाण, नारायण आटोळे, शहाजी अवचर, नानासाहेब जेधे, अशोक खळदकर, वरवंडचे माजी सरपंच रामदास दिवेकर, सुभाष बोत्रे, विठ्ठल थोरात यांच्यासह मान्यवरांचे अर्ज अवैध झालेले आहेत. ४विरोधकांचे राजकीय दबावापोटी जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद करण्यात आला असल्याचा आरोप भीमा-पाटसचे माजी उपाध्यक्ष सत्त्वशील शितोळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ४दरम्यान, या निकालाच्या विरोधात साखर सहसंचालकाकडे तक्रार करण्यात येणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांनी निवडणुकीला घाबरून विरोधकांचे अर्ज रद्द करण्याचे षड्यंत्र रचले असल्याचे स्पष्ट करून शितोळे म्हणाले की, सभासदांना भाव नाही तर कामगारांना पगार नाही, अशा दुहेरी कचाट्यात राहुल कुल अडकलेले असून, निवडणुकीत जनता त्यांच्या बाजूने कौल देईल की नाही याबाबत त्यांना साशंकता आहे. त्यामुळे कुल यांनी राजकीय वापर करून विरोधकांचे अर्ज बाद केले. वास्तविक पाहता मी कारखान्याला सलग तीन वर्षे ऊस दिला आहे. ४यासंदर्भातील दाखला कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी मला दिलेला आहे. गट क्र. ५४ वरून माझ्या अर्जावर हरकत घेण्यात आली. त्या गटात चुकीच्या पद्धतीने गुऱ्हाळ दाखविण्यात आले आहे. ही चूक मी कारखाना व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर या गटातील ऊस चाऱ्यासाठी दिल्याच्या कारणावरून माझा अर्ज बाद केला आहे. तेव्हा कारखान्याने एफआरपी दिलेली नाही. यासंदर्भात लवकरच भीमा पाटसवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.