शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मुद्रांक शुल्काचे ५१५ कोटी शासनाकडे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क पुणे : उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला मुद्रांक शुल्काचा निधी जिल्हा परिषदेला गेल्या पाच वर्षांपासून अपुरा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

पुणे : उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला मुद्रांक शुल्काचा निधी जिल्हा परिषदेला गेल्या पाच वर्षांपासून अपुरा मिळत आहे. गेल्या पाच वर्षांचा तसेच यंदाचा निधी असा जवळपास ५१५ कोटी रुपयांचा निधी शासनाकडे थकीत आहे. हा निधी मिळाला अर्थसंकल्पाचा अंदाज करण्यास जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला अडचणी येत आहे. यामुळे हा थकीत निधी त्वरित मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

जिल्ह्यातील विविध खरेदी विक्रीच्या स्टँप ड्यूटीतून जिल्हा परिषदेला शासनाकडून मुद्रांक शुल्क निधी मिळत असतो. जिल्हा परिषद व पंचायत सिमिती अधिनियमन १९६१ च्या कलम १५८अन्वये हा निधी दिला जातो. जिल्हा परिषदेचा उत्पन्नाचा हाच मुख्य स्रोत असतो. या निधीवरच अर्थसंकल्प अवलंबून असतो. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून हा अपुरा निधी मिळत आहे.

कोरोनामुळे या वर्षी आरोग्य सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च झाला. तसेच उत्पन्नाची अनेक साधने कमी झाल्याने जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात घट झाली आहे. यामुळे निधी उभारतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे विकासकामांतही अनेक अडचणी येत आहेत. निधी नसल्याने मतदारसंघात काय कामे करायची, असा प्रश्न सदस्यांपुढे निर्माण झाला आहे. २०१० ते २०१५ या काळावधीत मुद्रांक शुल्काचे ७०.२३ कोटी रुपये जिल्हा परिषदेला मिळाले नाही. त्यानंतर आजतागायत दरवर्षी ही रक्कम अपुऱ्या प्रमाणात जिल्हा परिषदेला मिळाली नाही. १० वर्षांची ३०३ कोटी तर २०२०-२१ ची २११.८४ कोटी रक्कम अशी एकूण ५१५.६ कोटी रुपये जिल्हा परिषदेला मिळालेली नाही.

कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे ही रक्कम या वर्षीतरी आतापर्यंतचा प्रलंबित निधी आणि पुढील वर्षाचा निधी पूर्ण मिळावा या साठी पदाधिकाऱ्यांनी राज्यशासनाकडे मागणी केली आहे.

---

चौकट

योजना राबवायच्या कशा ?

जिल्ह्या परिषदेच्या हक्काच्या मुद्रांक शुल्काच्या निधीत दरवर्षी तूट राहिली आहे. निधी पूर्ण मिळणे अपेक्षित असतानाही तो दरवर्षी अपुरा मिळाला असल्याने विकासकामांचे नियोजन करताना तारेवरची जिल्हा परिषदेला करावी लागते. यंदा कोरोनामुळे विकासकामांचे नियोजन करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. यावर्षीही हा नधी जर अपुऱ्या प्रमाणात मिळाला तर अनेक योजना आणि विकासकामे राबवायच्या कशा, हा प्रश्न पदाधिकाऱ्यांपुढे राहणार आहे.

कोट

जिल्हा परिषदेचा मुद्रांक शुल्कापोटी गेल्या १० वर्षांपासून ३०३ कोटींचा निधी अजून मिळालेला नाही. यामुळे या वर्षीचा २११.८४ कोटीचा आणि प्रलंबित असलेला असा ५१५ कोटी रुपये शासनाकडून मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या बाबतचे पत्र शासनाला पाठवले आहे. हा निधी मिळाल्यास विकासकामे चांगल्या पद्धतीने राबविता येणार आहे.

- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद