शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

५१ गडकिल्ले २४ दिवसांमध्ये पादाक्रांत

By admin | Updated: December 22, 2016 02:29 IST

राज्याच्या विविध भागांतील तब्बल ५१ गडकिल्ले पुण्यातील पिता-पुत्रांनी केवळ २४ दिवसांमध्ये पादाक्रांत केले. त्यासाठी २,६०० किलोमीटरचा

पुणे : राज्याच्या विविध भागांतील तब्बल ५१ गडकिल्ले पुण्यातील पिता-पुत्रांनी केवळ २४ दिवसांमध्ये पादाक्रांत केले. त्यासाठी २,६०० किलोमीटरचा प्रवास दुचाकीवरून, तर ४५० ते ५०० किलोमीटरचा प्रवास एसटी बसने करून रायगडावर या मोहिमेचा शेवट त्यांनी केला.दीपक माधव झोरे (वय ५७) आणि निरंजन दीपक झोरे (वय २०, शनिवार पेठ) अशी या पिता-पुत्रांची नावे असून, सर्व गडांच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला वेळ नोंदविण्यास त्यांनी विशिष्ट कॅमेऱ्याचा उपयोग केला आहे. सर्व मोहिमेची छायाचित्रे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.२१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान केलेल्या या पदभ्रमण मोहिमेत त्यांनी नगर जिल्ह्यातील साल्हेर हा ५,३३५ फूट, कळसूबाई शिखरापेक्षाही अधिक उंच असलेला गड तसेच जवळील सालोटा, मुल्हेरगड, मोरागड हे गडही केवळ ४ तासांमध्ये पादाक्रांत केले. राजगड ते तोरणा हा टे्रक फक्त २ तासांत पूर्ण केला. अनुभवी गिर्यारोहकांना याविषयी शंका येणे साहजिक आहे; मात्र दीपक झोरे यांनी या सर्व प्रवासाचा पुरावा म्हणून छायाचित्रण केले असून, छायाचित्रांवर तारखेसह गड चढण्यासाठी लागलेल्या वेळाची नोंद उपलब्ध आहे. एकूण २७ दिवसांच्या मोहिमेत ४ दिवस पुण्यात विश्रांती घेऊन, जीवनावश्यक वस्तू जमा करून त्यांनी पुन्हा पदभ्रमणाला सुरुवात केली होती. दीपक झोरे मिळेल ते काम करून कुटुंब चालवितात. त्यांच्या या पदभ्रमणाची सुरुवात त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेऊन केली. २४ दिवसांत ५१ किल्ले सर करण्याच्या या मोहिमेची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉडर््समध्ये व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.