शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

वालचंदनगरमध्ये ५०० लिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:11 IST

कोरोनाच्या लढ्यासाठी होणार उपयोग चिराग दोशी: ९३ ते ९६ टक्के शुद्ध ऑक्सिजन मिळणार वालचंदनगर : कोरोनावर मात करण्यासाठी ...

कोरोनाच्या लढ्यासाठी होणार उपयोग

चिराग दोशी: ९३ ते ९६ टक्के शुद्ध ऑक्सिजन मिळणार

वालचंदनगर : कोरोनावर मात करण्यासाठी व तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील कंपनीने मेक इन इंडियाअंतर्गत प्रतिमिनीट ५०० लिटर मेडिकल ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाची टेक्नॉलॉजी विकसित केली आहे अशी माहिती वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी दिली.

भारतामध्ये कोरोनाच्या महाभयंकर अशा दोन लाटा येऊन गेल्या आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली. तसेच दुसऱ्या लाटेमध्ये भारतात ठिकठिकाणी ऑक्सिजनची टंचाई जाणवू लागल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आला होता. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला होता. वालचंदनगर येथील कंपनी गेल्या ११२ वर्षापासून देश उभारणीच्या कामामध्ये मोलाचे योगदान देत आहे. कोरोनाच्या लढ्यामध्ये योगदान देण्यासाठी वालचंदनगर कंपनी गेल्या दीड वर्षापासून प्रयत्नशील आहे. कंपनीने सॅनिटायझेशन टँक, व्हेटिंलेटरची उपकरणे व मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची यशस्वी निर्मिती केली आहे. मेडिकल ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पासाठी संरक्षण व संशोधन विकास संस्था (डीआरडीओ) व पीएम केअर्सची मदत केली. वातावरणातील हवा घेऊन त्यापासून २५० लिटर प्रतिमिनीट व ५०० लिटर प्रतिमिनीट ऑक्सिजन निर्मिती बनविण्याची टेक्नॉलॉजी कंपनीने विकसित केली आहे.

आत्तापर्यंत २५० लिटर प्रतिमिनीट ऑक्सिजन निर्मितीचे दहा प्रकल्प नागालँड, त्रिपुरा, झारखंड व राजस्थान मधील हॉस्पिटल पीएम केअर्समधून देण्यात आले आहेत. देशातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प असावा यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. कंपनी सध्या एरोस्पेस, मिसाईल, संरक्षण, अणुऊर्जा, पाणबुडीचे गुंतागुंतीचे गिअर बॉक्स निर्मिती करून देशउभारणीच्या कामामध्ये सातत्याने मदत करीत असून महाराष्ट्रात याची गरज भसल्यास सर्वतोपरी सहकार्य करणार असून, याबाबत आरोग्य मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे दोशी यांनी सांगितले. या वेळी जनरल मॅनेजर धीरज केसकर, एकनाथ पेठे उपस्थित होते.

वातावरणातील हवा घेऊन तयार होणार ऑक्सिजन...

वालचंदनगर कंपनीने तयार केलेल्या मेडिकल ऑक्सिजन प्रकल्पामध्ये वातावरणातील हवा कॉम्प्रेशरच्या साह्याने घेऊन त्यातील आद्रता काढली जाते. मशीनद्वारे केमिकलचा वापर करून शुद्ध ऑक्सिजन निर्मिती केला जातो. याचे प्रमाण ९३ ते ९६ टक्के असून याचा उपयोग रुग्णासाठी केला जातो. तसेच हा मेडिकल ऑक्सिजन टाक्यामध्ये साठवून ठेवता येतो.

---------------------

वालचंदनगर(ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीने तयार केलेला मेडिकल ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प.

१८०९२०२१-बारामती-१२