शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

राज्यात रब्बीच्या ५० टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 04:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रब्बी हंगामाच्या जवळपास ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्वारी व गव्हाची तर उगवण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रब्बी हंगामाच्या जवळपास ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्वारी व गव्हाची तर उगवण झाली असून गव्हाला आता थंडीची प्रतिक्षा आहे. यावेळी पाऊस चांगला झाल्याने विहिरी, तलाव व अन्य साठ्यांमध्ये पाणी मुबलक आहे. हवामान चांगले राहिल्यास रब्बी हंगामातील पिके शेतकऱ्यांना हात देतील. पिकांवर किड पडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

रब्बी हंगांच्या राज्यातील एकूण ५१ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रापैकी २२ लाख ३३ हजार २४७ हेक्टरवर आता ज्वारी, गहू, मका तसेच हरभऱ्यासारखी कडधान्ये, करडई, जवस, तीळ, सूर्यफूल या तेलबियांची पेरणी सुरू आहे. चांगल्या हवामानामुळे पिकाची उगवण समाधानकारक आहे. खरीप हंगामातील अतिवृष्टीनंतर आता शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामावर केंद्रीत झाल्या आहेत.

रब्बीतील ज्वारीचे राज्यातील क्षेत्र २० लाख २७ हजार २५८ हेक्टर आहे. त्यापैकी ११ लाख ११ हजार ९६० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. रब्बीतले दुसरे महत्त्वाचे पीक असलेल्या गव्हाचे सरासरी क्षेत्र ८ लाख ७५ हजार ६३३ हेक्टर आहे. त्यापैकी १ लाख ४७ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

तेलबियांचे एकूण क्षेत्र ८९ हजार २२७ हेक्टर आहे. त्यापैकी १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात करडईचे प्रमाण जास्त असून ६ हजार ६८७ हेक्टरवर करडई आहे. ९८३ हेक्टरवर सूर्यफूलाची पेरणी करण्यात आली आहे. जवस व तीळ अनुक्रमे १ हजार ७८६ व ९७६ हेक्टरवर पेरले गेले आहेत. हरभऱ्याचे राज्यातील सरासरी क्षेत्र १७ लाख ४३ हजार २५९ आहे. त्यापैकी ८ लाख ३८ हजार हेक्टर पेरणी झाली आहे. यंदा राज्यात पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने रब्बीत दमदार उत्पादन होण्याची अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.