शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

राज्यात रब्बीच्या ५० टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 04:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रब्बी हंगामाच्या जवळपास ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्वारी व गव्हाची तर उगवण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रब्बी हंगामाच्या जवळपास ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्वारी व गव्हाची तर उगवण झाली असून गव्हाला आता थंडीची प्रतिक्षा आहे. यावेळी पाऊस चांगला झाल्याने विहिरी, तलाव व अन्य साठ्यांमध्ये पाणी मुबलक आहे. हवामान चांगले राहिल्यास रब्बी हंगामातील पिके शेतकऱ्यांना हात देतील. पिकांवर किड पडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

रब्बी हंगांच्या राज्यातील एकूण ५१ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रापैकी २२ लाख ३३ हजार २४७ हेक्टरवर आता ज्वारी, गहू, मका तसेच हरभऱ्यासारखी कडधान्ये, करडई, जवस, तीळ, सूर्यफूल या तेलबियांची पेरणी सुरू आहे. चांगल्या हवामानामुळे पिकाची उगवण समाधानकारक आहे. खरीप हंगामातील अतिवृष्टीनंतर आता शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामावर केंद्रीत झाल्या आहेत.

रब्बीतील ज्वारीचे राज्यातील क्षेत्र २० लाख २७ हजार २५८ हेक्टर आहे. त्यापैकी ११ लाख ११ हजार ९६० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. रब्बीतले दुसरे महत्त्वाचे पीक असलेल्या गव्हाचे सरासरी क्षेत्र ८ लाख ७५ हजार ६३३ हेक्टर आहे. त्यापैकी १ लाख ४७ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

तेलबियांचे एकूण क्षेत्र ८९ हजार २२७ हेक्टर आहे. त्यापैकी १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात करडईचे प्रमाण जास्त असून ६ हजार ६८७ हेक्टरवर करडई आहे. ९८३ हेक्टरवर सूर्यफूलाची पेरणी करण्यात आली आहे. जवस व तीळ अनुक्रमे १ हजार ७८६ व ९७६ हेक्टरवर पेरले गेले आहेत. हरभऱ्याचे राज्यातील सरासरी क्षेत्र १७ लाख ४३ हजार २५९ आहे. त्यापैकी ८ लाख ३८ हजार हेक्टर पेरणी झाली आहे. यंदा राज्यात पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने रब्बीत दमदार उत्पादन होण्याची अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.