शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के कालव्याच्या पाण्याची गळती

By admin | Updated: March 17, 2016 03:03 IST

एकीकडे जलजागृतीच्या माध्यमातून पाणी बचतीची मोहीम राबविली जात असताना धरणातून सोडलेले पाण्याचे शेवटपर्यंत पोहोचेपर्यंत ५० टक्के गळती होत असल्याची महत्त्वपूर्ण

बारामती : एकीकडे जलजागृतीच्या माध्यमातून पाणी बचतीची मोहीम राबविली जात असताना धरणातून सोडलेले पाण्याचे शेवटपर्यंत पोहोचेपर्यंत ५० टक्के गळती होत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. यामध्ये पाणी चोरीसह कालव्याची नादुरुस्ती, बाष्पीभवनामुळे ‘पाण्याच्या बचती’लाच ‘खो’ घातला जात आहे. नीरा डावा कालवा, उजवा कालवा, खडकवासला यांचे धरणापासूनचे अंतर किमान १२० ते १५० किलोमीटर इतके आहे. धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळेदेखील पाण्याची हानी होते. मात्र, पुढे धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडल्यानंतर कालवे, त्यावरील चाऱ्या, पोटचाऱ्यांमुळे पाण्याची हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. बाष्पीभवनाबरोबरच कालव्यांचे भराव, अस्तरीकरण ढासळल्यामुळे पाणी झिरपते. त्याचबरोबर कितीही उपाययोजना केल्या, कारवाई केली तरीदेखील सायफनने पाणी चोरीचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे आवर्तन सोडल्यापासून ते बंद करेपर्यंत किमान ५० टक्के पाण्याची गळती होत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून बंद नलिकेतून कालव्याचे पाणी सोडणे यावर पर्याय होऊ शकतो. परंतु, त्यामुळे कालव्यालगतच्या विहिरींना फटका बसेल. कालव्यातून झिरपलेले पाणी विहिरींमध्ये साठते. या पाण्यावरदेखील कर आकारणी केली जाते. त्यामुळे महसूलदेखील बुडेल, अशी स्थिती असताना कालव्याने वाहणाऱ्या पाण्याची गळती रोखणार कशी, याबाबत सध्या तरी कोणतीही उपाययोजना नाही, असे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पाण्याची गळती रोखणे अशक्य आहे. त्याचबरोबर बंद नलिकेतून पाणी आणल्यास शेतकऱ्यांना त्याचा त्रास होणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींना कालव्याच्या आवर्तनाच्या काळात पाझराचे पाणी मिळते. त्यावर शेती होते. नैसर्गिकरीत्या होत असलेली गळती रोखणे शक्य नाही. सायफनवर कारवाई सातत्याने होते. त्यामुळे ते प्रमाण कमी आहे.- ए. आर. भोसले, उपअभियंता, बारामती उपविभाग