शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के कालव्याच्या पाण्याची गळती

By admin | Updated: March 17, 2016 03:03 IST

एकीकडे जलजागृतीच्या माध्यमातून पाणी बचतीची मोहीम राबविली जात असताना धरणातून सोडलेले पाण्याचे शेवटपर्यंत पोहोचेपर्यंत ५० टक्के गळती होत असल्याची महत्त्वपूर्ण

बारामती : एकीकडे जलजागृतीच्या माध्यमातून पाणी बचतीची मोहीम राबविली जात असताना धरणातून सोडलेले पाण्याचे शेवटपर्यंत पोहोचेपर्यंत ५० टक्के गळती होत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. यामध्ये पाणी चोरीसह कालव्याची नादुरुस्ती, बाष्पीभवनामुळे ‘पाण्याच्या बचती’लाच ‘खो’ घातला जात आहे. नीरा डावा कालवा, उजवा कालवा, खडकवासला यांचे धरणापासूनचे अंतर किमान १२० ते १५० किलोमीटर इतके आहे. धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळेदेखील पाण्याची हानी होते. मात्र, पुढे धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडल्यानंतर कालवे, त्यावरील चाऱ्या, पोटचाऱ्यांमुळे पाण्याची हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. बाष्पीभवनाबरोबरच कालव्यांचे भराव, अस्तरीकरण ढासळल्यामुळे पाणी झिरपते. त्याचबरोबर कितीही उपाययोजना केल्या, कारवाई केली तरीदेखील सायफनने पाणी चोरीचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे आवर्तन सोडल्यापासून ते बंद करेपर्यंत किमान ५० टक्के पाण्याची गळती होत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून बंद नलिकेतून कालव्याचे पाणी सोडणे यावर पर्याय होऊ शकतो. परंतु, त्यामुळे कालव्यालगतच्या विहिरींना फटका बसेल. कालव्यातून झिरपलेले पाणी विहिरींमध्ये साठते. या पाण्यावरदेखील कर आकारणी केली जाते. त्यामुळे महसूलदेखील बुडेल, अशी स्थिती असताना कालव्याने वाहणाऱ्या पाण्याची गळती रोखणार कशी, याबाबत सध्या तरी कोणतीही उपाययोजना नाही, असे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पाण्याची गळती रोखणे अशक्य आहे. त्याचबरोबर बंद नलिकेतून पाणी आणल्यास शेतकऱ्यांना त्याचा त्रास होणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींना कालव्याच्या आवर्तनाच्या काळात पाझराचे पाणी मिळते. त्यावर शेती होते. नैसर्गिकरीत्या होत असलेली गळती रोखणे शक्य नाही. सायफनवर कारवाई सातत्याने होते. त्यामुळे ते प्रमाण कमी आहे.- ए. आर. भोसले, उपअभियंता, बारामती उपविभाग