शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

५० टक्के कालव्याच्या पाण्याची गळती

By admin | Updated: March 17, 2016 03:03 IST

एकीकडे जलजागृतीच्या माध्यमातून पाणी बचतीची मोहीम राबविली जात असताना धरणातून सोडलेले पाण्याचे शेवटपर्यंत पोहोचेपर्यंत ५० टक्के गळती होत असल्याची महत्त्वपूर्ण

बारामती : एकीकडे जलजागृतीच्या माध्यमातून पाणी बचतीची मोहीम राबविली जात असताना धरणातून सोडलेले पाण्याचे शेवटपर्यंत पोहोचेपर्यंत ५० टक्के गळती होत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. यामध्ये पाणी चोरीसह कालव्याची नादुरुस्ती, बाष्पीभवनामुळे ‘पाण्याच्या बचती’लाच ‘खो’ घातला जात आहे. नीरा डावा कालवा, उजवा कालवा, खडकवासला यांचे धरणापासूनचे अंतर किमान १२० ते १५० किलोमीटर इतके आहे. धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळेदेखील पाण्याची हानी होते. मात्र, पुढे धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडल्यानंतर कालवे, त्यावरील चाऱ्या, पोटचाऱ्यांमुळे पाण्याची हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. बाष्पीभवनाबरोबरच कालव्यांचे भराव, अस्तरीकरण ढासळल्यामुळे पाणी झिरपते. त्याचबरोबर कितीही उपाययोजना केल्या, कारवाई केली तरीदेखील सायफनने पाणी चोरीचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे आवर्तन सोडल्यापासून ते बंद करेपर्यंत किमान ५० टक्के पाण्याची गळती होत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून बंद नलिकेतून कालव्याचे पाणी सोडणे यावर पर्याय होऊ शकतो. परंतु, त्यामुळे कालव्यालगतच्या विहिरींना फटका बसेल. कालव्यातून झिरपलेले पाणी विहिरींमध्ये साठते. या पाण्यावरदेखील कर आकारणी केली जाते. त्यामुळे महसूलदेखील बुडेल, अशी स्थिती असताना कालव्याने वाहणाऱ्या पाण्याची गळती रोखणार कशी, याबाबत सध्या तरी कोणतीही उपाययोजना नाही, असे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पाण्याची गळती रोखणे अशक्य आहे. त्याचबरोबर बंद नलिकेतून पाणी आणल्यास शेतकऱ्यांना त्याचा त्रास होणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींना कालव्याच्या आवर्तनाच्या काळात पाझराचे पाणी मिळते. त्यावर शेती होते. नैसर्गिकरीत्या होत असलेली गळती रोखणे शक्य नाही. सायफनवर कारवाई सातत्याने होते. त्यामुळे ते प्रमाण कमी आहे.- ए. आर. भोसले, उपअभियंता, बारामती उपविभाग