शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धरण साखळीत जमला ५ महिन्यांचा पाणीसाठा

By admin | Updated: July 6, 2016 03:23 IST

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला आहे. दरम्यान, दिवसभरात

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला आहे. दरम्यान, दिवसभरात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे आजही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात परिसरातील नाले, ओढ्यांमधून पाणी येणे सुरूच होते. त्यामुळे चारही धरणांमधील पाणीसाठ्याने ५.४९ टीएमसीची पाणीपातळी गाठली असून, हे पाणी शहराला पुढील पाच महिने पुरेल एवढे असल्याचे महापालिका, तसेच पाटबंधारे विभागाने सांगितले.शनिवार (दि.२) पासूनच या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झालेली होती. रविवारी आणि सोमवारी पावसाचा जोर अधिक असल्याने शनिवारी सकाळी १.४१ टीएमसीपर्यंत खाली आलेला पाणीसाठा आज ५.५० टीएमसीवर पोहोचला आहे. शनिवारी या धरणसाखळीतील टेमघर धरणात ०.००, तर वरसगाव धरणात अवघा ०.०९ टीएमसी पाणी शिल्लक होते. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या पावसानेच टेमघर धरणात 0.३२ टीएमसी, तर वरसगाव धरणात १.८१ टीएमसी पाणी साठले असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)दोन दिवसांत मिटला प्रश्नया चारही धरणांमध्ये झालेल्या पावसाने पुणे शहराला पुढील पाच महिने पुरेल एवढा पाणीसाठा तयार झालेला आहे. शहराला दरदिवशी महापालिकेकडून ० .०३ टीएमसी पाणी पाटबंधारे विभागाकडून घेतले जाते. त्यामुळे महिन्याला शहराला सरासरी ०.९० टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. मात्र, जून महिना कोरडा गेल्याने धरणांमध्ये असलेले पाणी हे जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढेच होते. मात्र, आता हे पाणी शहरास डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत पुरेल एवढे आहे.