शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रारूप मतदारयादीमध्ये झाल्या ४६० दुरूस्त्या

By admin | Updated: January 23, 2017 03:25 IST

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर एकूण ९०९ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या,

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर एकूण ९०९ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या, त्याची पडताळणी केल्यानंतर ४६० हरकतींचा योग्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार योग्य त्या दुरूस्त्या करण्यात आल्या आहेत.महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी रविवारी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली. प्रशासनाकडून प्रारूप मतदार यादी १२ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात आली होती. या प्रारूप रचनेवर ९०९ हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये धनकवडी क्षेत्रिय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये सर्वाधिक ३०७ इतक्या मतदारांच्या अदला-बदली झाल्याच्या हरकती आल्या होत्या. तर सर्वात कमी २२ हरकती घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत प्रभागामध्ये आल्या आहेत. या हरकतींची पडताळणी करून अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रभागरचनेप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्या बनवितानाही राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात आला होती. प्रशासनाकडे आलेल्या हरकतींची पडताळणी केल्यानंतर ४६० तक्रारी योग्य असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित हरकतींपैकी काही तक्रारी हदद्ीबाहेरच्या नागरिकांच्या होत्या. काही तक्रारी या दुबार आल्या होत्या. त्यानुसार त्यामध्ये योग्य ते बदल करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलर्णी यांनी दिली. निवडणूक कार्यालयनिहाय प्रभागनिहाय आलेल्या हरकतींची आकडेवारी पुढीलप्रमाणे होती. औंध ३१, घोले रोड २२, कोथरूड १०५, वारजे-कर्वेनगर ४९, ढोलेपाटील रस्ता २७, येरवडा १३, वडगावंव शेरी ५२, भवानी पेठ २४, कसबा-विश्रामबागवाडा ३६, टिळकरोड ५२, सहकारनगर ३३, बिबवेवाडी ५१, धनकवडी ३०७, कोंढवा-वानवडी ३०७, हडपसर ४० हरकती नोंदविण्यात आली आहे. स्वारगेट येथील नाईक बि बियाणे केंद्र, सेवा मित्र मंडळ चा भाग हा प्रभाग क्रमांक १५ मध्ये येत असताना तो प्रभाग १८ मध्ये दाखविण्यात आला. त्याचबरोबर सोन्या मारूती परिसरातील काही भाग प्रभाग १७ मध्ये येत असताना प्रभाग १८ मध्ये समाविष्ट करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. येरवडयाच्या व्हाइट हाऊस सोसायटीचा परिसर तसेच रामवाडीचा काही भाग प्रभाग ५ मध्ये येत नसतानाही तो जोडण्यात आल्याचीही तक्रार करण्यात आली होती. प्रभागनिहाय याद्या करताना प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली गेली नसल्याचा सुर या तक्रारींमधून उमटला होता.