शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

नदीपात्राच्या भरावातून निघाली ४६ ट्रक माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:12 IST

म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यानची नदीपात्राच्या निळ्या रेषेच्या आत झालेल्या बांधकामांना अखेर महापालिकेने हात घातला. निळ्या रेषेच्या आत भराव टाकून केलेली जमीन या कारवाईत काढून टाकण्यात येत आहे.

पुणे : म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यानची नदीपात्राच्या निळ्या रेषेच्या आत झालेल्या बांधकामांना अखेर महापालिकेने हात घातला. निळ्या रेषेच्या आत भराव टाकून केलेली जमीन या कारवाईत काढून टाकण्यात येत आहे. आतापर्यंत ३४ ट्रक माती काढण्यात आली असून, अजून किमान दीड आठवडा तरी ही कारवाई सुरू राहणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली.गेल्या काही वर्षांत या भागात नदीपात्रात भराव टाकून स्थानिक जमीनमालकांनी जागा तयार केल्या. त्या धनिकांनी विकत अथवा भाडेतत्त्वावर घेतल्या व तिथे मंगल कार्यालये, हॉटेल्स, क्लब सुरू केले. ग्रीन बेल्टमधील ४ टक्के बांधकामाची अधिकृत परवानगी घेऊन तिथे मोठमोठी बैठी बांधकामे केली. हे होत होते, त्या वेळी महापालिकेकडून काही बांधकामांकडे दुर्लक्ष करण्यात आले तर काही जणांना नोटिसा देण्यात आल्या. त्यांनी महापालिकेच्या न्यायालयातून जैसे थे आदेश मिळवला. या सर्व प्रकारात नदीपात्राचे मोठे नुकसान झाले.त्यामुळेच काही स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दावा दाखल केला. त्याची सुनावणी होऊन न्यायालयाने महापालिकेला ही सर्व बांधकामे चार आठवड्यांत पाडून टाकण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे महापालिकेने पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांबरोबर संयुक्त पाहणी करून बेकायदेशीर बांधकामे निश्चित केली. त्या बांधकामाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. ४ टक्के वगळता त्यांची जी बांधकामे अनधिकृत ठरली, ती पाडून टाकण्याच्या नोटिसा त्यांना देण्यात आल्या.त्यानुसार काही जागामालकांनी जास्तीची बांधकामे पाडली. ज्यांनी ते केले नाही, त्यांची बांधकामे महापालिकेने काढली. आता या सर्व जागामालकांनी नदीपात्रात माती टाकून जो भराव घातला होता, तो उखडून काढण्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागासह, अतिक्रमणविरोधी व अन्य विभागांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी झालेल्या कारवाईच्या वेळी पाटबंधारे खात्याचे अधिकारीही उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता; मात्र काहीही अनुचित प्रकार घडला नाही.एकूण ३४ ट्रक माती आतापर्यंत काढण्यात आली आहे. नदीपात्राचा निळ्या रेषेतील भाग ही माती काढून मोकळा करण्यात आला आहे. अजून काही दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे. न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार महापालिकेला सर्व नदीपात्र मोकळे करावे लागणार आहे. त्यानंतर अहवाल न्यायाधिकरणाला सादर करावा लागेल.