शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
5
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
6
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
7
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
8
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
9
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
11
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
12
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
13
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
14
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
15
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
16
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
17
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
18
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
19
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
20
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा

नदीपात्राच्या भरावातून निघाली ४६ ट्रक माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:12 IST

म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यानची नदीपात्राच्या निळ्या रेषेच्या आत झालेल्या बांधकामांना अखेर महापालिकेने हात घातला. निळ्या रेषेच्या आत भराव टाकून केलेली जमीन या कारवाईत काढून टाकण्यात येत आहे.

पुणे : म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यानची नदीपात्राच्या निळ्या रेषेच्या आत झालेल्या बांधकामांना अखेर महापालिकेने हात घातला. निळ्या रेषेच्या आत भराव टाकून केलेली जमीन या कारवाईत काढून टाकण्यात येत आहे. आतापर्यंत ३४ ट्रक माती काढण्यात आली असून, अजून किमान दीड आठवडा तरी ही कारवाई सुरू राहणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली.गेल्या काही वर्षांत या भागात नदीपात्रात भराव टाकून स्थानिक जमीनमालकांनी जागा तयार केल्या. त्या धनिकांनी विकत अथवा भाडेतत्त्वावर घेतल्या व तिथे मंगल कार्यालये, हॉटेल्स, क्लब सुरू केले. ग्रीन बेल्टमधील ४ टक्के बांधकामाची अधिकृत परवानगी घेऊन तिथे मोठमोठी बैठी बांधकामे केली. हे होत होते, त्या वेळी महापालिकेकडून काही बांधकामांकडे दुर्लक्ष करण्यात आले तर काही जणांना नोटिसा देण्यात आल्या. त्यांनी महापालिकेच्या न्यायालयातून जैसे थे आदेश मिळवला. या सर्व प्रकारात नदीपात्राचे मोठे नुकसान झाले.त्यामुळेच काही स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दावा दाखल केला. त्याची सुनावणी होऊन न्यायालयाने महापालिकेला ही सर्व बांधकामे चार आठवड्यांत पाडून टाकण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे महापालिकेने पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांबरोबर संयुक्त पाहणी करून बेकायदेशीर बांधकामे निश्चित केली. त्या बांधकामाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. ४ टक्के वगळता त्यांची जी बांधकामे अनधिकृत ठरली, ती पाडून टाकण्याच्या नोटिसा त्यांना देण्यात आल्या.त्यानुसार काही जागामालकांनी जास्तीची बांधकामे पाडली. ज्यांनी ते केले नाही, त्यांची बांधकामे महापालिकेने काढली. आता या सर्व जागामालकांनी नदीपात्रात माती टाकून जो भराव घातला होता, तो उखडून काढण्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागासह, अतिक्रमणविरोधी व अन्य विभागांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी झालेल्या कारवाईच्या वेळी पाटबंधारे खात्याचे अधिकारीही उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता; मात्र काहीही अनुचित प्रकार घडला नाही.एकूण ३४ ट्रक माती आतापर्यंत काढण्यात आली आहे. नदीपात्राचा निळ्या रेषेतील भाग ही माती काढून मोकळा करण्यात आला आहे. अजून काही दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे. न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार महापालिकेला सर्व नदीपात्र मोकळे करावे लागणार आहे. त्यानंतर अहवाल न्यायाधिकरणाला सादर करावा लागेल.