शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

शेती नुकसानीची ४३ कोटी भरपाई प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्रीय पथकाने पाहणी केल्यानंतरही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील आणखी ४३ कोटी रुपये सरकारने अजून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्रीय पथकाने पाहणी केल्यानंतरही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील आणखी ४३ कोटी रुपये सरकारने अजून दिलेले नाहीत. कृषी विभागाने राज्य सरकारकडे याची मागणी केली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील २ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामे करण्यात आले. त्यानंतर शेतमाल आणि जमिनीच्या नुकसानीपायी ८७ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. यातल्या ४४ कोटी रुपयांचे वाटप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झाले आहे.

कृषी, तसेच महसूल विभागाच्या तालुका तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे त्वरित पाहणी करून नुकसानीचे पंचनामे तयार केले. राज्याकडून दिवाळीनंतर ४४ कोटी रुपये पाठवले. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने त्याचे वाटप केले. मात्र, ते पूर्ण करता आलेले नाही.

सरकारी नियमाप्रमाणे दोन हेक्टरसाठी नुकसानभरपाई मिळते. जिरायती व बागायतीला हेक्टरी १० हजार व फळपिकाच्या नुकसानीला हेक्टरी २५ हजार रुपये मदत मिळते. रक्कम अपुरी आल्याने प्रशासनाने सर्वच नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना एक हेक्टरसाठीच मदत दिली आहे. पुढची रक्कम मिळाल्यानंतर दुसऱ्या हेक्टरचे वाटप करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

असे आहे जिल्ह्यातील नुकसान

जिरायती- २४ हजार ४७० हेक्टर

बाधित शेतकरी- ७३ हजार १३५

बागायती- ४८ हजार ८४० हेक्टर

बाधित शेतकरी- १ लाख १५ हजार ६७६

फळपिकांचे नुकसान -४ हजार ८४८ हेक्टर

बाधित शेतकरी- ९ हजार ९२७

जमिनीचे नुकसान -९१९ हेक्टर

बाधित शेतकरी - ४ हजार ३९३

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी -१ लाख ९८ हजार ७१८

मदतीसाठी एकूण निधीची मागणी - ८७ कोटी रूपये

प्राप्त निधी -४४ कोटी

मदतीचा लाभ मिळालेले शेतकरी -१ लाख

मदतीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी -९८ हजार ७१८.