शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेती नुकसानीची ४३ कोटी भरपाई प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्रीय पथकाने पाहणी केल्यानंतरही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील आणखी ४३ कोटी रुपये सरकारने अजून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्रीय पथकाने पाहणी केल्यानंतरही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील आणखी ४३ कोटी रुपये सरकारने अजून दिलेले नाहीत. कृषी विभागाने राज्य सरकारकडे याची मागणी केली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील २ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामे करण्यात आले. त्यानंतर शेतमाल आणि जमिनीच्या नुकसानीपायी ८७ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. यातल्या ४४ कोटी रुपयांचे वाटप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झाले आहे.

कृषी, तसेच महसूल विभागाच्या तालुका तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे त्वरित पाहणी करून नुकसानीचे पंचनामे तयार केले. राज्याकडून दिवाळीनंतर ४४ कोटी रुपये पाठवले. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने त्याचे वाटप केले. मात्र, ते पूर्ण करता आलेले नाही.

सरकारी नियमाप्रमाणे दोन हेक्टरसाठी नुकसानभरपाई मिळते. जिरायती व बागायतीला हेक्टरी १० हजार व फळपिकाच्या नुकसानीला हेक्टरी २५ हजार रुपये मदत मिळते. रक्कम अपुरी आल्याने प्रशासनाने सर्वच नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना एक हेक्टरसाठीच मदत दिली आहे. पुढची रक्कम मिळाल्यानंतर दुसऱ्या हेक्टरचे वाटप करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

असे आहे जिल्ह्यातील नुकसान

जिरायती- २४ हजार ४७० हेक्टर

बाधित शेतकरी- ७३ हजार १३५

बागायती- ४८ हजार ८४० हेक्टर

बाधित शेतकरी- १ लाख १५ हजार ६७६

फळपिकांचे नुकसान -४ हजार ८४८ हेक्टर

बाधित शेतकरी- ९ हजार ९२७

जमिनीचे नुकसान -९१९ हेक्टर

बाधित शेतकरी - ४ हजार ३९३

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी -१ लाख ९८ हजार ७१८

मदतीसाठी एकूण निधीची मागणी - ८७ कोटी रूपये

प्राप्त निधी -४४ कोटी

मदतीचा लाभ मिळालेले शेतकरी -१ लाख

मदतीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी -९८ हजार ७१८.