शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

चासकमानमध्ये ४.२४ टीएमसीच साठा

By admin | Updated: December 25, 2015 01:56 IST

पाणी सोडण्याचा प्राधिकरणाने निर्णय आजही राखून ठेवला आहे. मात्र , ज्या चासकमान धरणातून ३ टिएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता

चासकमान : उजनी धरणात पाणी सोडण्याचा प्राधिकरणाने निर्णय आजही राखून ठेवला आहे. मात्र , ज्या चासकमान धरणातून ३ टिएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता, त्या धरणात आता फक्त ४.२४ टिएमसीच पाणी शिल्लक आहे. मग यातील किती पाणी उजनीत सोडणार व किती पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी शिल्लक राहणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. चासकमान धरणातून उजनीत पाणी सोडण्याच्या निर्णयानंतर येथील शेतकरी हादरला होता. धरणाची क्षमता ३ टिएमसी आहे. त्यातील शेतीसाठी ११२ दलघमी राखीव आहे. यातील ७३ दलघमी पाणी सोेडण्याचे पूर्वीचे आदेश होते. या आदेशानुसार चासकमानच्या लाभक्षेत्रासाठी ३९ दलघमी पाणी शिल्लक राहणार होते. यातील पाण्यातून चासकमान लाभक्षेत्रासाठीचे आवर्तन सुरू आहे. यात पिण्याच्या पाण्याचाही समावेश आहे. यामुळे याच आवर्तनात हे पाणी संपणार आहे. मग पुढील सात महिने यांच्या शेतीसाठी पाणीच मिळणार नाही. पिकं जळून जातील या चिंतेने शेतकरी संतप्त झाले होते. हे पाणी सोडण्यास विरोध करीत होते. उच्च नायालयाने प्राधाकिरणाचा निर्णय रद्द करून पुन्हा नव्याने निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. मात्र आजही निर्णय होवू शकला नाही. त्यामुळे त्यांची चिंता कायम राहिली आहे.चासकमान धरणाची आजची स्थिती जाणून घेतली असता धरणात फक्त ४. २४ टिएमसी उपयुक्त साटा शिल्लक राहिला आहे. शिरूर व खेड तालुक्यास वरदान ठरलेल्या चासकमान धरणातून दि. १६ नोव्हेंबर रोजी डाव्या कालव्यास रब्बी आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली. यामुळे कांदा, गहू, हरभरा व चारा पिकांना मोठा फायदा झाला. चाळीस दिवसांच्या आवर्तनामध्ये धरणातील पाणी ७८ टक्क्यांवरून थेट ५५ टक्क्यांवर आले आहे. चाळीस दिवसांच्या आवर्तनात २३ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. धरणात १४५.९४ द.ल.घ.मी. म्हणजे ५.२ टिएमसी एकूण साठा तर ११८.७५ द.ल.घ.मी. म्हणजे ४.२४ टिएमसी उपयुक्तसाटा शिल्लक आहे. आवर्तन अजुनही सुरूच आहे. डाव्या कालव्यास ५५० क्युसेक्स वेगाने सोडण्यात आलेले पाणी आजपासुन कमी करून १०० क्युसेक्स करण्यात आले आहे. त्यामुळे हा साठा अजूनही कमी होणार आहे. त्यामुळे जर प्राधिकरणाने पाणी सोडण्याचा निर्णय पुन्हा नव्याने घेतला तर पाण्याची येथे गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. (वार्ताहर)