शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

चासकमानमध्ये ४.२४ टीएमसीच साठा

By admin | Updated: December 25, 2015 01:56 IST

पाणी सोडण्याचा प्राधिकरणाने निर्णय आजही राखून ठेवला आहे. मात्र , ज्या चासकमान धरणातून ३ टिएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता

चासकमान : उजनी धरणात पाणी सोडण्याचा प्राधिकरणाने निर्णय आजही राखून ठेवला आहे. मात्र , ज्या चासकमान धरणातून ३ टिएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता, त्या धरणात आता फक्त ४.२४ टिएमसीच पाणी शिल्लक आहे. मग यातील किती पाणी उजनीत सोडणार व किती पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी शिल्लक राहणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. चासकमान धरणातून उजनीत पाणी सोडण्याच्या निर्णयानंतर येथील शेतकरी हादरला होता. धरणाची क्षमता ३ टिएमसी आहे. त्यातील शेतीसाठी ११२ दलघमी राखीव आहे. यातील ७३ दलघमी पाणी सोेडण्याचे पूर्वीचे आदेश होते. या आदेशानुसार चासकमानच्या लाभक्षेत्रासाठी ३९ दलघमी पाणी शिल्लक राहणार होते. यातील पाण्यातून चासकमान लाभक्षेत्रासाठीचे आवर्तन सुरू आहे. यात पिण्याच्या पाण्याचाही समावेश आहे. यामुळे याच आवर्तनात हे पाणी संपणार आहे. मग पुढील सात महिने यांच्या शेतीसाठी पाणीच मिळणार नाही. पिकं जळून जातील या चिंतेने शेतकरी संतप्त झाले होते. हे पाणी सोडण्यास विरोध करीत होते. उच्च नायालयाने प्राधाकिरणाचा निर्णय रद्द करून पुन्हा नव्याने निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. मात्र आजही निर्णय होवू शकला नाही. त्यामुळे त्यांची चिंता कायम राहिली आहे.चासकमान धरणाची आजची स्थिती जाणून घेतली असता धरणात फक्त ४. २४ टिएमसी उपयुक्त साटा शिल्लक राहिला आहे. शिरूर व खेड तालुक्यास वरदान ठरलेल्या चासकमान धरणातून दि. १६ नोव्हेंबर रोजी डाव्या कालव्यास रब्बी आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली. यामुळे कांदा, गहू, हरभरा व चारा पिकांना मोठा फायदा झाला. चाळीस दिवसांच्या आवर्तनामध्ये धरणातील पाणी ७८ टक्क्यांवरून थेट ५५ टक्क्यांवर आले आहे. चाळीस दिवसांच्या आवर्तनात २३ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. धरणात १४५.९४ द.ल.घ.मी. म्हणजे ५.२ टिएमसी एकूण साठा तर ११८.७५ द.ल.घ.मी. म्हणजे ४.२४ टिएमसी उपयुक्तसाटा शिल्लक आहे. आवर्तन अजुनही सुरूच आहे. डाव्या कालव्यास ५५० क्युसेक्स वेगाने सोडण्यात आलेले पाणी आजपासुन कमी करून १०० क्युसेक्स करण्यात आले आहे. त्यामुळे हा साठा अजूनही कमी होणार आहे. त्यामुळे जर प्राधिकरणाने पाणी सोडण्याचा निर्णय पुन्हा नव्याने घेतला तर पाण्याची येथे गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. (वार्ताहर)