शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर, बारामतीतील ४२ गावे होणार समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील २७ आणि पुरंदर तालुक्यातील १५ गावांनी सत्यमेव जयते समृद्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील २७ आणि पुरंदर तालुक्यातील १५ गावांनी सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेत सहभाग घेतला आहे. प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांच्या ‘पानी’ फाऊंडेशनच्या वतीने ही स्पर्धा घेतली जात आहे. जिल्ह्यातील अन्य सर्व यंत्रणा या गावांच्या समृध्दीसाठी एकत्र येणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून ‘पानी’ फाऊंडेशनच्या वतीने राज्यातील दुष्काळग्रस्त भागात वाॅटर कप स्पर्धा घेऊन लोकसहभागातून गावे जलयुक्त करण्याचा प्रयत्न केला. आता या स्पर्धेला व्यापक स्वरूप दिले आहे. गावात केवळ जलयुक्तसाठीच नाही तर गावांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने काम करणार आहे. समृद्ध गाव स्पर्धेत जलव्यवस्थापन, मृदा व जलसंधारण, पौष्टिक गवताचे संरक्षित कुरण, वृक्षलागवड, मातीची सुपीकता वाढविणे आणि गावकऱ्यांचे दरडोई उत्पन्नात वाढ करणे हे प्रमुख उद्देश ठेवून गावांचा सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त लोकसहभाग व प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने विविध कामे करणार आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकताच या तालुक्यांचा दौरा करून समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांचा देखील आढावा घेतला. या गावाच्या विकासासाठी आता जिल्ह्यातील सर्व यंत्रणा म्हणजेच जिल्हा परिषद, कृषी विभाग, रोजगार हमी योजना, महसूल यंत्रणा एकत्र येऊन काम करणार आहेत.

--

गावांच्या विकासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र व समन्वयाने काम करावे

बारामती आणि पुरंदर तालुक्यातील २७ गावांचा खऱ्या अर्थाने सर्वागीण विकास करायचा असेल तर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी एकाच वेळी एकत्र येऊन व समन्वय साधून कामे केली पाहिजेत. यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही पुढाकार घेत आहे. या संदर्भात नुकतीच आढावा बैठक घेऊन सर्व यंत्रणांना तसे आदेश दिले आहेत.

डाॅ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी