शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

४२ कोटी लिटर पाणी एका पावसात मुरणार

By admin | Updated: May 30, 2017 02:09 IST

‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धेत दीड महिन्याच्या कालावधीत सुमारे ४ लाख २० हजार घनमीटर एवढे प्रचंड जलसंधारणाचे

लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : ‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धेत दीड महिन्याच्या कालावधीत सुमारे ४ लाख २० हजार घनमीटर एवढे प्रचंड जलसंधारणाचे काम झाले असून एका पावसात ४२ कोटी लिटर पाणी मुरणार आहे. यामुळे या ३३ गावांतील ग्रामस्थांना आता पावसाची प्रतीक्षा आहे. यातून जलसंधारणाचे काम झालेच, शिवाय मन संधारणाचेही मोठे काम झाले आहे.या स्पर्धेसाठी पुरंदर व इंदापूर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली होती. पुरंदर तालुक्यातील सुमारे ३३ गावांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. सिनेअभिनेते आमिर खान यांच्या या उदात्त संकल्पनेतून गाव पाणीदार करण्यासाठी गेल्या ८ एप्रिलपासून पुरंदर तालुक्यात शासनाला जे चार वर्षांत जमले नाही त्यापेक्षा मोठे काम उभे राहिले आहे. ग्रामस्थांचा लोकसहभागही दिसून आला. नुकतीच २२ मे रोजी ही स्पर्धा संपली. ३३ गावांनी सहभाग घेतला असला तरीही यातील साकुर्डे, पोखर, वाघापूर, आंबळे, मावडी क. प., चांबळी, पांगारे, हरणी, केतकावळे, बोऱ्हाळवाडी, मांढर या गावांनी रस दाखवला होता. स्पर्धेसाठी असणारी प्रश्नपत्रिका सोडवली आहे. यात लोकसहभागाबरोबरच मनुष्यबळ व यांत्रिक मशिनरीद्वारे कामे झाली आहेत. भारतीय जैन संघटनेने अनेक गावांना यंत्रासामग्री पुरवली होती. ग्रामस्थांची लोकवर्गणी तसेच काही सामाजिक संस्थांनी तसेच उद्योजकांनी आर्थिक मदतही केली होती. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी गावे दत्तक घेतली होती. मात्र त्यांच्याकडून ग्रामस्थांसोबत श्रमदानाव्यतिरिक्त एक रुपयाचीही मदत होऊ शकलेली नाही, उलट श्रमदानाचा फार्सच जास्त करून ग्रामस्थांना खर्चात पाडण्याचेच काम झाले आहे. ग्रामस्थांनी जिद्दीने व चिकाटीने गाव पाणीदार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी केलेल्या कामाचे फलित पाऊस पडल्यानंतरच दिसणार आहे.कोठे एकट्याची लढाई तर कुठे शेकडोंचा सहभागकाही गावांनी खूप मोठे काम केले तर काही गावातून शक्य होईल तेवढे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. कोठे एकट्याची लढाई तर कुठे शेकडो ग्रामस्थांचा सहभाग दिसत होता. यातून त्यांच्या जिद्दीचे दर्शन होत होते. दीड महिन्याच्या कालावधीत सलग समतल चर, कंपार्टमेंट बंडिंग, अनगड दगडी बांध, पाझर तलाव, नालेदुरुस्ती, नांदेड टाईप शोष खड्डे, प्रतिमाणसी वृक्ष लागवडीसाठी खड्डे, बांधबंदिस्ती आदींसारखी कामे केली आहेत. यातून पावसाचे पाणी जिरवण्याचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे.गावाच्या शिवारातच हे पाणी राहणार सर्व गावातील अधिकृत नोंदीनुसार ४ लाख २० हजार घनमीटर एवढे काम झालेले आहे. पाऊस पडला तर सुमारे ४२ कोटी लिटर पाणी एका पावसात जमिनीत मुरणार आहे. तेवढा एका वेळी साठा होणार आहे. आता गावागावांतून पावसाची प्रतीक्षा सुरू झाली आहे, असे पाणी फाऊंडेशनचे पुरंदर तालुका समन्वयक सुरेश सस्ते यांनी सांगितले.