शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४२ कोटी लिटर पाणी एका पावसात मुरणार

By admin | Updated: May 30, 2017 02:09 IST

‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धेत दीड महिन्याच्या कालावधीत सुमारे ४ लाख २० हजार घनमीटर एवढे प्रचंड जलसंधारणाचे

लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : ‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धेत दीड महिन्याच्या कालावधीत सुमारे ४ लाख २० हजार घनमीटर एवढे प्रचंड जलसंधारणाचे काम झाले असून एका पावसात ४२ कोटी लिटर पाणी मुरणार आहे. यामुळे या ३३ गावांतील ग्रामस्थांना आता पावसाची प्रतीक्षा आहे. यातून जलसंधारणाचे काम झालेच, शिवाय मन संधारणाचेही मोठे काम झाले आहे.या स्पर्धेसाठी पुरंदर व इंदापूर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली होती. पुरंदर तालुक्यातील सुमारे ३३ गावांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. सिनेअभिनेते आमिर खान यांच्या या उदात्त संकल्पनेतून गाव पाणीदार करण्यासाठी गेल्या ८ एप्रिलपासून पुरंदर तालुक्यात शासनाला जे चार वर्षांत जमले नाही त्यापेक्षा मोठे काम उभे राहिले आहे. ग्रामस्थांचा लोकसहभागही दिसून आला. नुकतीच २२ मे रोजी ही स्पर्धा संपली. ३३ गावांनी सहभाग घेतला असला तरीही यातील साकुर्डे, पोखर, वाघापूर, आंबळे, मावडी क. प., चांबळी, पांगारे, हरणी, केतकावळे, बोऱ्हाळवाडी, मांढर या गावांनी रस दाखवला होता. स्पर्धेसाठी असणारी प्रश्नपत्रिका सोडवली आहे. यात लोकसहभागाबरोबरच मनुष्यबळ व यांत्रिक मशिनरीद्वारे कामे झाली आहेत. भारतीय जैन संघटनेने अनेक गावांना यंत्रासामग्री पुरवली होती. ग्रामस्थांची लोकवर्गणी तसेच काही सामाजिक संस्थांनी तसेच उद्योजकांनी आर्थिक मदतही केली होती. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी गावे दत्तक घेतली होती. मात्र त्यांच्याकडून ग्रामस्थांसोबत श्रमदानाव्यतिरिक्त एक रुपयाचीही मदत होऊ शकलेली नाही, उलट श्रमदानाचा फार्सच जास्त करून ग्रामस्थांना खर्चात पाडण्याचेच काम झाले आहे. ग्रामस्थांनी जिद्दीने व चिकाटीने गाव पाणीदार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी केलेल्या कामाचे फलित पाऊस पडल्यानंतरच दिसणार आहे.कोठे एकट्याची लढाई तर कुठे शेकडोंचा सहभागकाही गावांनी खूप मोठे काम केले तर काही गावातून शक्य होईल तेवढे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. कोठे एकट्याची लढाई तर कुठे शेकडो ग्रामस्थांचा सहभाग दिसत होता. यातून त्यांच्या जिद्दीचे दर्शन होत होते. दीड महिन्याच्या कालावधीत सलग समतल चर, कंपार्टमेंट बंडिंग, अनगड दगडी बांध, पाझर तलाव, नालेदुरुस्ती, नांदेड टाईप शोष खड्डे, प्रतिमाणसी वृक्ष लागवडीसाठी खड्डे, बांधबंदिस्ती आदींसारखी कामे केली आहेत. यातून पावसाचे पाणी जिरवण्याचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे.गावाच्या शिवारातच हे पाणी राहणार सर्व गावातील अधिकृत नोंदीनुसार ४ लाख २० हजार घनमीटर एवढे काम झालेले आहे. पाऊस पडला तर सुमारे ४२ कोटी लिटर पाणी एका पावसात जमिनीत मुरणार आहे. तेवढा एका वेळी साठा होणार आहे. आता गावागावांतून पावसाची प्रतीक्षा सुरू झाली आहे, असे पाणी फाऊंडेशनचे पुरंदर तालुका समन्वयक सुरेश सस्ते यांनी सांगितले.