शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

४१ कारखान्यांनी केले ६ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : यंदाच्या गाळप हंगामाच्या पहिल्या महिन्यातच राज्यातील ४१ साखर कारखान्यांनी ६ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : यंदाच्या गाळप हंगामाच्या पहिल्या महिन्यातच राज्यातील ४१ साखर कारखान्यांनी ६ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती केली आहे. आणखी ३२ कारखाने इथेनॉल उत्पादन घेणार असून त्यामुळे १०८ कोटी लिटर उत्पादनाचे वार्षिक उद्दीष्ट सहज गाठले जाईल असे सााखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे.

यंदा राज्यात ऊसाचे प्रमाण जास्त आहे. साखरेचे जादा उत्पादन झाल्यास साखरेचे भाव कोसळण्याची भीती आहे. त्यावर उपाय म्हणून १० टक्के म्हणजे १० लाख टन साखर उत्पादन कमी करुन त्याऐवजी इथेनॉल निर्मितीचे धोरण राज्य सरकारने स्विकारले आहे. इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारनेही प्रोत्साहन दिले असून इथेनॉल उत्पादन प्रकल्प ऊभारणीच्या कर्जावरील व्याजावर अनुदान देऊ केले आहे.

यंदा हंगामाच्या पहिल्याच महिन्यात ६ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन साखर कारखान्यांनी घेतले. बी मोलेसीस (साखर असलेली मळी), सी मोलेसीस (साखर नसलेली मळी) याशिवाय शुगर सिरप व शुगर ज्यूस या ४ पद्धतीने इथेनॉल निर्मिती होत आहे. गेल्या वर्षी राज्याने १८ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन घेतले. केंद्र सरकारने राज्याला यंदा १०८ कोटी लिटर इथेनॉलचे उद्दीष्ट दिले आहे. कारखान्यांनी सध्याचा वेग कायम राखला तर हे उद्दीष्ट यंदाच्या हंगामात ओलांडले जाण्याची शक्यता साखर आयुक्तालयातील सूत्रांनी व्यक्त केली.

चौकट

“राज्यातील साखर कारखानदारीला वळण देणारे अनेक बदल येत्या काही वर्षात होतील. जगभरात सगळीकडे इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉलला वाढती मागणी आहे. त्या तुलनेत आरोग्यविषयक जागृतीमुळे आहारातून साखरेचे महत्व कमी होत आहे. राज्यातलाच नव्हे तर देशातील साखर उद्योग ब्राझीलच्या वळणावर जाईल असे दिसते.”

-शेखर गायकवाड, साखर आयुक्त, महाराष्ट्र.