शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

पुण्यातील वाहतूक कोंडीवर ४०० किलोमीटरच्या रस्त्याचा मुलामा

By नितीन चौधरी | Updated: October 17, 2022 18:13 IST

नवे उड्डाण पूल, भुयारी मार्ग करणार....

पुणे : “पुणे शहरातील वाहतूक कोंडी व रस्त्यांची दुर्दशा दूर करण्यासाठी ४०० किलोमीटरचे रस्ते नव्याने दुरुस्त करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी ठेवला आहे. त्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून पाऊस संपल्यानंतर या कामाला सुरुवात केली जाईल. ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्त करून चालणार आहे तेथे दुरुस्ती आणि जेथे नव्याने रस्ते करावे लागणार आहेत, तेथे नवे रस्ते केले जाणार आहेत. त्यातून वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न असेल,” अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पाटील यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार राहुल कुल आदी उपस्थित होते. ते म्हणाले, “यंदा पावसामुळे शहरातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. त्यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केल्यानंतर पावसामुळे ते काम पु्न्हा खराब होत आहे. त्यामुळे पाऊस थांबू द्या त्यानंतरच रस्त्यांची नीट कामे करा अशा सूचना दिल्या आहेत. महापालिका आयुक्त विक्रमकुमार व पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी एका आराखडा सुचवला आहे. त्यात शहरातील ४०० किलोमीटरच्या रस्त्यांची नव्याने दुरुस्ती करण्यात येणार आहे. केवळ दुरुस्तीच नव्हे तर डांबराचा नवीन थर टाकून ते तयार करण्यात येतील. यामध्ये जास्त वाहतूक असलेल्या रस्त्यांचा समावेश करण्यात येईल.”

दिवाळीत चलन फाडणार नाहीत -

पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सीएसआर निधीमधून सहाशे ट्रॅफिक कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक चौकात एक दोन कर्मचारी वाहतूक नियमन करतील. दिवाळीत नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना देण्यात येणाऱ्या चलनांमुळे रस्त्यातच कोंडी होते. ती टाळण्यासाठी दिवाळीच्या काळात वाहतूक पोलिस कोणतेही चलन फाडणार नाहीत असे निर्देशही त्यांनी या वेळी दिले. मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेले रस्ते पुन्हा दुरुस्त करण्यात येतील. त्यासाठी मेट्रो किंवा महापालिका ते दुरुस्त करतील. एकमेंकावर चालढकल न करता महापालिकेने हे दुरुस्त केल्यास त्याचा खर्च महामेट्रोकडून वसूल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

नवे उड्डाण पूल, भुयारी मार्ग करणार

तसेच एल अँड टी कंपनीने वाहतूक कोंडी दूर करण्याची एक योजना सुचविली आहे. त्यात काही ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग सुचविले आहेत. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर दोन तीन महिन्यांत त्याचा आराखडा अंतिम करून राज्य सरकारकडे निधी मागण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. शहरातील नाल्यांच्या दुरुस्तीची कामेही करण्यात येणार असून त्यात खोलीकरण, रुंदीकरण व भिंत बांधण्याचे काम करण्यात येईल. याबाबत महापालिका एक आराखडा तयार करून त्यासाठी राज्य सरकारकडे निधीची मागणी करण्यात येईल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे यांची टीकापुण्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांच्या दुर्दशेची लक्तरे वेशीवर टांगली गेली. याला महापालिकेतील पाच वर्षे सत्तेत असलेले २४ बाय ७ वाले सत्ताधारीच जबाबदार आहेत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. स्मार्ट पुणे हा उपक्रमच नापास झाला आहे. स्मार्ट सिटीसाठी देशभरात ५० हजार कोटी तर अमृत सिटीसाठी आणखी ५० हजार कोटी असा एक लाख कोटी खर्च झाला आहे. त्याचा खरेच किती फायदा झाला याचे कुणी ऑडिट केले आहे का, असा सवालही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

आजच्या बैठकीत त्यांनी मेट्रोची को नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करू असे सांगितले. मेट्रोची निम्मी कामे अजून सुरूही झालेली नाहीत. तर ती एका महिन्यात पूर्ण कशी होतील असेही त्या म्हणाल्या. पुण्यात होणाऱ्या विकासकामांचे कोणतेही नियोजन नसून त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांमुळे सामान्य पुणेकरांचे हाल होत आहेत.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटील