शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

आरटीईचे ३८ हजार प्रवेश, मोठ्या प्रमाणात जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:33 IST

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठीच्या आॅनलाइन प्रवेशाच्या पहिल्या फेरीत राज्यभरातून ३७ हजार ९७५ प्रवेश झाले आहेत.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठीच्या आॅनलाइन प्रवेशाच्या पहिल्या फेरीत राज्यभरातून ३७ हजार ९७५ प्रवेश झाले आहेत. आरटीई प्रवेशाच्या जागा पहिल्या फेरीअखेर मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिल्या आहेत. या जागांच्या प्रवेशासाठी दुसरी फेरी १६ एप्रिलपासून सुरू होणार असून, त्यासाठीची लॉटरी सोडत १८ व १९ एप्रिल रोजी काढली जाणार आहे.राज्यभरातील ९ हजार शाळांमध्ये आरटीई प्रवेशाच्या १ लाख २६ हजार जागा उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी ५६ हजार २३८ अर्ज आले होते. त्यापैकी पहिल्या फेरीअखेर ३७ हजार ९७५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे. रिक्त राहिलेल्या जागांसाठी दुसरी फेरी १६ एप्रिलपासून सुरू होत आहे. १६ एप्रिल रोजी रिक्त राहिलेल्या जागांची माहिती प्रकाशित केली जाईल. त्यानंतर १८ व १९ एप्रिल रोजी लॉटरीची सोडत काढून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली जातील. त्यांना प्रवेश घेण्यासाठी २० एप्रिल ते ५ मे २०१८ पर्यंत वेळ दिला जाईल, अशी माहिती राज्याचे उपसंचालक शरद गोसावी यांनी दिली.पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा दुसऱ्या फेरीसाठी विचार केला जाणार नाही. पहिल्या फेरीत आरटीई प्रवेशासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली, त्यामुळे त्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली नाही. शासनाकडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना आरटीई शुल्काचा परतावा दिला नसल्याने पहिल्या टप्प्यात त्यांच्याकडून प्रवेश देण्यास आडकाठी करण्यात आली होती. त्याचबरोबर ४१ शाळा न्यायालयातदेखील गेल्या आहेत. त्यानंतर शासनाने या शाळांच्या शुल्काचा परतावा संबंधित शाळांच्या खात्यात जमा केला आहे. शाळेत प्रवेश निश्चित झाल्याच्या तुलनेत प्रत्यक्ष प्रवेश घेतलेल्यांची संख्या कमी आहे. पहिल्या फेरीत प्रवेश मिळूनही १८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही.>प्रशासक नेमण्याचा एकही प्रस्ताव नाहीआरटीईअंतर्गत प्रवेश देण्यास नकार देणाºया शाळांवर कारवाई करून तिथे प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश प्राथमिकच्या संचालकांनी दिले होते. मात्र, त्यानुसार आतापर्यंत एकाही शाळेवर प्रशासक नेमण्याची कारवाई करण्याचा प्रस्ताव आलेला नाही. पहिली फेरी शुक्रवारी संपली असल्याने याबाबतची माहिती मिळण्यास आणखी वेळ लागणार आहे.>त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्नही लवकरच निकालीआरटीई प्रवेशाचे परतावा शुल्क शासनाकडून मिळाले नसल्याने ४१ शाळा न्यायालयात गेल्या होत्या. तिथल्या प्रवेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत तिथे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्व शाळांचे परतावा शुल्क शासनाकडून जमा करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या १८ एप्रिल रोजी न्यायालयात होणाºया सुनावणीमध्ये ही स्थगिती उठण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश घेता येईल. हे प्रवेश रिक्त ठेवूनच दुसºया फेरीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा