शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईचे ३८ हजार प्रवेश, मोठ्या प्रमाणात जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:33 IST

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठीच्या आॅनलाइन प्रवेशाच्या पहिल्या फेरीत राज्यभरातून ३७ हजार ९७५ प्रवेश झाले आहेत.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठीच्या आॅनलाइन प्रवेशाच्या पहिल्या फेरीत राज्यभरातून ३७ हजार ९७५ प्रवेश झाले आहेत. आरटीई प्रवेशाच्या जागा पहिल्या फेरीअखेर मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिल्या आहेत. या जागांच्या प्रवेशासाठी दुसरी फेरी १६ एप्रिलपासून सुरू होणार असून, त्यासाठीची लॉटरी सोडत १८ व १९ एप्रिल रोजी काढली जाणार आहे.राज्यभरातील ९ हजार शाळांमध्ये आरटीई प्रवेशाच्या १ लाख २६ हजार जागा उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी ५६ हजार २३८ अर्ज आले होते. त्यापैकी पहिल्या फेरीअखेर ३७ हजार ९७५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे. रिक्त राहिलेल्या जागांसाठी दुसरी फेरी १६ एप्रिलपासून सुरू होत आहे. १६ एप्रिल रोजी रिक्त राहिलेल्या जागांची माहिती प्रकाशित केली जाईल. त्यानंतर १८ व १९ एप्रिल रोजी लॉटरीची सोडत काढून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली जातील. त्यांना प्रवेश घेण्यासाठी २० एप्रिल ते ५ मे २०१८ पर्यंत वेळ दिला जाईल, अशी माहिती राज्याचे उपसंचालक शरद गोसावी यांनी दिली.पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा दुसऱ्या फेरीसाठी विचार केला जाणार नाही. पहिल्या फेरीत आरटीई प्रवेशासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली, त्यामुळे त्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली नाही. शासनाकडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना आरटीई शुल्काचा परतावा दिला नसल्याने पहिल्या टप्प्यात त्यांच्याकडून प्रवेश देण्यास आडकाठी करण्यात आली होती. त्याचबरोबर ४१ शाळा न्यायालयातदेखील गेल्या आहेत. त्यानंतर शासनाने या शाळांच्या शुल्काचा परतावा संबंधित शाळांच्या खात्यात जमा केला आहे. शाळेत प्रवेश निश्चित झाल्याच्या तुलनेत प्रत्यक्ष प्रवेश घेतलेल्यांची संख्या कमी आहे. पहिल्या फेरीत प्रवेश मिळूनही १८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही.>प्रशासक नेमण्याचा एकही प्रस्ताव नाहीआरटीईअंतर्गत प्रवेश देण्यास नकार देणाºया शाळांवर कारवाई करून तिथे प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश प्राथमिकच्या संचालकांनी दिले होते. मात्र, त्यानुसार आतापर्यंत एकाही शाळेवर प्रशासक नेमण्याची कारवाई करण्याचा प्रस्ताव आलेला नाही. पहिली फेरी शुक्रवारी संपली असल्याने याबाबतची माहिती मिळण्यास आणखी वेळ लागणार आहे.>त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्नही लवकरच निकालीआरटीई प्रवेशाचे परतावा शुल्क शासनाकडून मिळाले नसल्याने ४१ शाळा न्यायालयात गेल्या होत्या. तिथल्या प्रवेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत तिथे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्व शाळांचे परतावा शुल्क शासनाकडून जमा करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या १८ एप्रिल रोजी न्यायालयात होणाºया सुनावणीमध्ये ही स्थगिती उठण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश घेता येईल. हे प्रवेश रिक्त ठेवूनच दुसºया फेरीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा