शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आॅनलाइन परवानगीसाठी ३८० मंडळांचेच अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:37 IST

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांना विविध प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात.

पुणे : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांना विविध प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. गेल्या काही वर्षांपासून एक खिडकी योजना सुरू करण्यात आली होती. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत यंदाच्या वर्षी पोलिसांनी चक्क मंडळांसाठी आॅनलाइन परवानगीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत ३८० मंडळांनी आॅनलाइन अर्ज केले असून दहीहंडीनंतर त्यामध्ये आणखी वाढ होईल, अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांची लगबग सुरू झाली आहे. अनेक मंडळांनी मंडप, स्पीकर आणि सजावटीच्या कामाला सुरुवात केली आहे. मंडळांना वाहतूक पोलीस, महापालिका आणि पोलीस ठाण्यांची परवानगी आवश्यक असते. दरवर्षी मंडळे स्थानिक पोलीस ठाण्यांमधील एक खिडकीमध्ये जाऊन परवानगीसाठी अर्ज दाखल करतात. या अर्जांची पडताळणी होऊन त्यांना परवानगी दिली जाते. मात्र, यावर्षी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत आॅनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली. मंडळांची बैठक घेऊन या योजनेची माहिती दिली होती.ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३८० मंडळांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील १५० अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. ५० अर्ज मनपाकडे परवानगीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. मंडळांनी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर हे अर्ज वाहतूक शाखेकडे पाठविले जातात. त्यानंतर ते मनपाकडे जातात. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यांकडून अंतिम परवानगी देण्यात येते. अनेक मंडळांनी अपूर्ण अर्ज भरल्याने, तसेच आवश्यक कागदपत्रे न जोडल्याने पडताळणीमध्ये अडचणी येत आहेत. सध्या दहीहंडी उत्सवाच्या तयारीमध्ये मंडळांचे कार्यकर्ते व्यस्त आहेत. दहीहंडी झाल्यानंतर अर्जांची संख्या झपाट्याने वाढेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. गणेशचतुर्थीनंतरही अनेक मंडळांचे अर्ज येत राहतात. आॅनलाइन अर्ज दाखल करण्याच्या सुविधेचा जवळपास सर्वच महत्त्वाच्या मंडळांनी लाभ घेतला आहे. मानाचा पहिला कसबा गणपती, सेवा मित्र मंडळ, हत्ती गणपती मंडळ, शाहू चौक मंडळ यांच्यासह अनेक मोठ्या मंडळांनी आॅनलाइन परवानगी मिळवली आहे.>नेमकी कागदपत्रे न जोडल्याने अडचणीआॅनलाइन अर्ज करताना गणेश मंडळांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, सरचिटणीस, खजिनदार यांचे नाव, ई-मेल, मोबाईल व फोटो अपलोड करावे लागतात. धर्मादाय आयुक्त नोंदणी प्रमाणपत्र मागील वर्षीचे मनपा परवाने, पोलीस परवाने, ना-हरकतपत्रही जोडावे लागते. ही कागदपत्रे आॅनलाइन अर्ज भरताना अ‍ॅटॅच करावी लागतात. नेमकी ही कागदपत्रे न जोडल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे मंडळांनी आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.