शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

ऊस उत्पादकांना ठिबकसाठी एकरी ३५ हजार बिनव्याजी !

By admin | Updated: December 17, 2015 02:07 IST

दिवसेंदिवस जाणवणारी पाणीटंचाई, रासायनिक खतांची बचत व कार्यक्षमतेने वापर होणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे यांसाठी ठिबक सिंचन हे प्रभावी व गरजेचे असल्याने भीमाशंकर सहकारी साखर कारखाना

अवसरी : दिवसेंदिवस जाणवणारी पाणीटंचाई, रासायनिक खतांची बचत व कार्यक्षमतेने वापर होणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे यांसाठी ठिबक सिंचन हे प्रभावी व गरजेचे असल्याने भीमाशंकर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी ठिबक योजना राबविणार असल्याची माहिती उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडे विविध ठिबक संच उत्पादित/पुरवठादार कंपन्यांकडून आलेल्या प्रस्तावाबाबत कारखान्याचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठिबक सिंंचनवाढीसाठी योजना राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. बेंडे यांनी याविषयी अधिक माहिती देताना नमूद केले, की ठिबक योजनेअंतर्गत ठिबक संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांचा एकरी ५ हजार रुपये रक्कम कारखान्याकडे जमा करणे आवश्यक आहे. त्यानंंतर कारखाना सूचनेनुसार शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर ठिबक क्षेत्राचा आवश्यक आराखडा व संचउभारणी पूर्ण झाल्यानंतर शेतकी विभागाच्या शिफारशीनुसार एकरी २५ हजार रुपये बिनव्याजी वसूलपात्र रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या वतीने कारखान्यामार्फत ठिबक संचपुरवठाधारकाला देण्यात येईल.याव्यतिरिक्त एकरी १० हजार रुपयांसाठी कारखान्याशी करार केले. कंपनी १४ महिन्यांकरिता बिनव्याजी थांबणार आहे. अशा प्रकारे ३५ हजार रुपये बिनव्याजी रक्कम शेतकऱ्यांच्या गाळपास किंवा बेण्यास येणाऱ्या ऊस पेमेंटमधून कपात करण्यात येईल, असे बेंडे यांनी सांगितले.ते म्हणाले, ‘‘कपात केलेल्या रकमेपैकी १० हजार रुपये संबंधित ठिबक सिंचन कंपनीला अदा केले जातील. वरील योजना कारखान्याने शासनमान्यप्राप्त ठिबक उत्पादक/पुरवठादार कंपनीबरोबर रीतसर करार करण्यात येऊन राबविताना शेतकऱ्यांसाठी विविध सेवासुविधांचा अंतर्भाव असेल. त्यामध्ये प्रामुख्याने एका वर्षाचा ठिबक संच विमा तसेच १ लाखाचा वैयक्तिक शेतकरी विमा यासाठी प्रिमीयम रक्कम पुरवठादार कंपनीमार्फत भरली जाणार आहे.’’ (वार्ताहर)