शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

जिल्हाबाह्य ३१ शिक्षकांच्या बदल्या वादात

By admin | Updated: June 20, 2015 01:07 IST

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाला पुण्याच्या शिक्षण मंडळ शाळेमध्ये बदली देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी

पुणे : अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाला पुण्याच्या शिक्षण मंडळ शाळेमध्ये बदली देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी पुणे महापालिका शिक्षण मंडळ पुन्हा एकदा चर्चेत आहे. मात्र, या बदलीबरोबरच आणखी ३० शि़क्षकांच्या बदल्यांना आठ दिवसांपूर्वीच प्रशासकीय धोरणाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे या बदल्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. शिक्षण मंडळाचा कारभार मागील वर्षी महापालिका प्रशासनाकडे आल्यानंतर गेल्या सात ते आठ महिन्यांपासून या बदल्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडून थांबविण्यात आला होता. मात्र, शाळा सुरू होऊन शिक्षकांची गरज असल्याचे कारण पुढे करून या बदल्यांना मान्यता घेण्यात आली असल्याची माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे या बदली प्रकरणी आणखी मोठे गैरव्यवहार झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नोकरी करणाऱ्या एका शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या शिक्षकाची पत्नी पुणे शिक्षण मंडळाच्या शाळेमध्ये शिक्षिका आहे. त्यामुळे या शिक्षकाने पुण्यात बदली मागितली होती.पुणे शिक्षण मंडळाची त्याला अनुमती आवश्यक होती. त्यासाठी प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ (अध्यक्ष), रवींद्र चौधरी (माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य), संतोष मेमाणे (लिपिक) आणि भाऊसाहेब बाबासाहेब भापकर (मध्यस्थ) यांनी संबधित शिक्षकाकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत.आठ दिवसांपूर्वीच ३१ बदल्यांना मान्यता -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनच्या एका बदल्यांच्या आदेशानुसार, ज्या शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी अथवा पत्नी महापालिकेच्या सेवेत असल्यास त्याच्या पती अथवा पत्नीला पालिका सेवेत बदली करून घेता येते. -या आदेशानुसार, शिक्षण मंडळात जिल्हाबाह्य बदल्यांसाठी ३१ अर्ज आले होते. त्यांतील २८ अर्ज मराठी माध्यमासाठी, तर ३ इंग्रजी माध्यमासाठी होते. धोरणात्मक मान्यतेचा प्रस्तावही महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. -मात्र, महापालिका शाळांना नेमकी किती शिक्षकांची गरज आहे? तसेच शाळांची पटपडताळणी झाली नसल्याने हा प्रस्ताव बाजूला ठेवला होता. -दरम्यानच्या काळात शिक्षण मंडळाच्या शाळा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असताना, शिक्षकांची गरज असल्याचे कारण पुढे करून या बदल्यांना मान्यता देण्यात आली आहे. त्यातच या बदलीचाही समावेश होता.बदल्यांना संशयाचा धूर-राज्य शासनाच्या नियमानुसार तसेच त्यांनी दिलेल्या अटीनुसार या बदल्यांना महापालिका आयुक्तांनी धोरणात्मक मान्यता दिली होती. त्यानंतर या शिक्षकांशी संपर्क साधून त्यांना बदलीचे पत्र देण्याची जबबादारी शिक्षण मंडळाकडे असते. -त्यानुसार, महापालिका आयुक्त कार्यालयाकडून ही धोरणात्मक मान्यता देऊन तो प्रस्ताव मंडळाला पाठविण्यात आला होता. -त्यामुळे मंडळाकडून किती जणांना ही बदलीची पत्रे देण्यात आली आहेत? त्यात काही गैरव्यवहार झाला आहे का? असेल तर कोण सामील आहे? किती गैरव्यवहार झाला आहे? याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. -त्यामुळे या बदल्याही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली असून, शिक्षण मंडळाचे आणखी काही कर्मचारी तसेच राजकीय पदाधिकारीही या बदली प्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.