शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

७ महिन्यांत ३०६ विद्युत रोहित्रांची चोरी

By admin | Updated: January 11, 2015 23:59 IST

प्रामुख्याने शेतीपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने उभारलेल्या रोहित्र संचांपैकी गेल्या ७ महिन्यांत पुणे जिल्ह्यात तब्बल ३०६ रोहित्रांची चोरी झाली

प्रज्ञा सिंग-केळकर, पुणेप्रामुख्याने शेतीपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने उभारलेल्या रोहित्र संचांपैकी गेल्या ७ महिन्यांत पुणे जिल्ह्यात तब्बल ३०६ रोहित्रांची चोरी झाली असून, त्याचा मोठा फटका महावितरणला आर्थिकदृष्ट्या बसला आहेच़ त्याचबरोबरच नवीन रोहित्र बसविण्यास अनेक दिवस वाट पाहावी लागल्याने शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसत आहे़ महावितरणच्या पुणे परिमंडळात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांबरोबरच मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यांचा समावेश होतो़ या तालुक्यांमध्ये गेल्या ७ महिन्यांत ८६ रोहित्र चोरीच्या घटना घडल्या़ सर्वाधिक चोरीचे प्रमाण बारामती विभागात आहे़ या विभागात शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि भोर तालुक्यांचा समावेश आहे़ एप्रिल ते डिसेंबर २०१४अखेर २२० रोहित्र चोरीच्या घटना घडल्या आहेत़ गेल्या काही दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यात रोहित्र चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शहरे किंवा वस्त्यांच्या तुलनेत निर्जनस्थळी असलेल्या शेतांमध्ये रोहित्र चोरीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. या चोऱ्या रोखण्यासाठी लोकांनी, शेतकऱ्यांनी सतर्क राहणे, पाळत ठेवणे आणि चोऱ्या होऊ नयेत म्हणून पुढाकार घेणे गरजेचे आहे. रोहित्र चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे तसेच महावितरणचे नुकसान होते व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. रोहित्र चोरीस गेल्यानंतर ग्राहकांना मिळणारी वीजसेवा प्रभावित होते. रोहित्र सार्वजनिक ठिकाणी व निर्जनस्थळी असल्याने ते सांभाळण्यासाठी महावितरणकडे स्वतंत्र यंत्रणा नाही. महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी सावध राहून पोलीस यंत्रणा व महावितरणला माहिती दिल्यास रोहित्र चोरी टाळणे शक्य आहे. शेतकरी बांधवांच्या कृषी पंपांना ज्या रोहित्रावरून वीजपुरवठा होतो, ते रोहित्र सांभाळण्याची जबाबदारी शेतकरी ग्राहकांवरच टाकली आहे़ रोहित्र चोरीच्या घटना रोखण्यासाठी महावितरणने अनेक उपाययोजना केल्या आहेत़ रोहित्रांना वेल्ंिडग करून ते वीज खांबांना (डबल पोल) जोडण्यात आले आहेत. तसेच, पोलिसांना गस्त घालण्यासाठी महावितरणकडून वाहन व कर्मचारी वेळोवेळी मदतीला देण्यात आलेले आहेत. वारंवार रोहित्र चोरीस जात असल्याने त्या ठिकाणी नवीन रोहित्र बदलून देण्याबाबतचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. चोरीस गेलेले रोहित्र यापुढे बदलून देण्यात येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय होण्याची शक्यता आहे.