शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

३०० एकरांवरील टोमॅटो भुईसपाट!

By admin | Updated: June 10, 2015 04:53 IST

खोडद, मांजरवाडी, हिवरे व परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने टोमॅटेच्या बागा व डाळिंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

खोडद : काल (सोमवारी) सायंकाळी ६च्या सुमारास खोडद, मांजरवाडी, हिवरे व परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने टोमॅटेच्या बागा व डाळिंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मांजरवाडी परिसरात गारपीट व वादळामुळे सुमारे २५० एकर क्षेत्रातील, तर खोडद व हिवरेतर्फे नारायणगाव परिसरात सुमारे ५० एकर क्षेत्रातील टोमॅटोच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या बागा, डाळिंबांची झाडे उन्मळून पडली आहेत. जनावरांचा चारा, मका भुईसपाट झाला आहे. काही ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने विद्युत ताराही तुटल्या आहेत, तर बाभळीसारखे कठीण झाडेसुद्धा उन्मळून पडली आहेत.मांजरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतीमालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हिवरे परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. डाळिंब व टोमॅटोचे उत्पन्न घेण्याची वेळ तोंडाशी आली असताना वादळी वारा व गारपिटीसह झालेल्या पावसामुळे शेतकरी हताश झाला आहे.हिवरेतर्फे नारायणगाव येथील गहिना भोर यांच्या डाळिंबबागेतील सुमारे ५० डाळिंबाची झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत, तर येथील संजय दशरथ भोर या शेतकऱ्याचा ४ एकर क्षेत्राचा टोमॅटोचा प्लॉटदेखील सलग भुईसपाट झाला आहे. मांजरवाडी येथील गायकवाडमळ्यातील सुमारे ७० एकर क्षेत्रातील टोमॅटो, मका, डाळिंब आदी पिकांची हानी झाली आहे. टोमॅटोला गेल्या १० ते १५ वर्षांपासून चांगला बाजारभाव मिळत असल्याने या पिकाने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ‘अर्थ’ प्राप्त करून दिला असल्याने टोमॅटोचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल दिवसेंदिवस वाढू लागला आहे. टोमॅटोला उत्पादनापर्यंत शेतकरी एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. सध्या टोमॅटोला २२० रुपये ते ३०० रुपये क्रेटला बाजारभाव मिळत आहे; मात्र सोमवारी झालेल्या गारपीट व वादळाचा प्रचंड मोठा तडाखा टोमॅटोला बसला आहे.दरम्यान, जुन्नरचे तहसीलदार प्रल्हाद हिरामणी व जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे यांनी आज (मंगळावारी) सकाळी मांजरवाडी, खोडद व हिवरेतर्फे नारायणगाव या गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. मांजरवाडी परिसरातील शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. (वार्ताहर)