शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
3
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
4
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
5
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
6
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
7
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
8
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
9
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
10
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
11
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
12
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
13
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
14
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
15
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
16
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
17
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
18
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
19
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
20
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे

पुण्यात दररोज ३५ टक्के पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 03:25 IST

इतर शहरांच्या तुलनेत दुप्पट पाणी वापर; तरी पाणीपट्टी थकली

- श्रीकिशन काळेपुणे : पुणे महापाालिका सध्या खडकवासला धरण प्रकल्पातून दररोज १३५ कोटी लिटर पाणी उचलत आहे. प्रतिमाणशी ३३७ लिटर पुणेकरांना पाणी मिळते. हे पाणी इतर शहरांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. असे असतानाही येथे पाणीपट्टीचे ५०० कोटीथकले असून तब्बल ३५ टक्के पाण्याची गळती होत आहे.शहराची लोकसंख्या साधारण ५० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे महापालिका जलसंपदा विभागाकडून १३५० एमएलडी पाणी घेते. महापालिका अधिक पाणी वापरते म्हणून दौंड, हवेली, इंदापूर या तालुक्यांना कमी पाणी पडत असल्याचे जलसंपदा सांगते. त्यामुळे या भागात पाण्यासाठी ओरड होते. पुणेकरांनी पाण्याची उधळपट्टी केल्यास उन्हाळ्यात कमतरता जाणवेल, असा इशारा जलसंपदा विभाग वेळोवेळी देत असते. तरी शहरातील पाणी वापर कमी झालेला दिसत नाही. पुणेकरांना दरदिवशी प्रतिमाणसी ३३७ लिटर पाणी मिळत आहे. इतर शहरांच्या तुलनेत हे पाणी दुप्पट आहे. यावर मीटर हाच पर्याय असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.नवीन जलवाहिन्या टाकणारशहरातील जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. या जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. या जलवाहिन्या लवकरच बदलण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. पाणपट्टीचे थकलेले ५०० कोटी वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.प्रशासनाने पाणी मोफत दिले पाहिजे; पण, जर कोणी पाण्याचा अपव्यव करीत असेल तर मग त्यावर कडक कारवाई करायला हवी. पाणी जपून वापरावे म्हणून ते महाग केले जाणे हा काही पर्याय नाही. नागरिकांनीही पाणीबचतीवर लक्ष दिले पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे.- उपेद्र धोंडे, जलतज्ज्ञ२४ तास पाणी हवे, तर होणार अधिक खर्च2600 कोटी रुपये खर्च शहरात समान पाणीपुरवठा योजना लागू करण्यासाठी होणार आहे.48 किलोमीटरच्या पाइपलाइन आणि ६७ टाक्या बांधण्याची कामे गेल्या वर्षभरात झाली आहेत. ही योजना पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर शहरात समान पाणीपुरवठा होईल.अपव्यय टाळण्यासाठी मीटरचा पर्यायपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मीटरद्वारे पाणीपुरवठा करणे हा एकमेव पर्याय आहे. जे मोजले जात नाही त्याचे व्यवस्थापन करता येत नाही. एकदा का मीटरद्वारे पाणी पुरविण्याची व्यवस्था आणि त्यावर देखरेख करणारी व्यवस्था उभारली की, पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे शक्य होते. त्यातून पाणीबचतीचा प्रचार-प्रसारही करता येतो. पाण्याचा पुरवठा मोजणी करूनच देणे अत्यंत गरजेचे आहे.- अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा प्रमुख, महापालिका