शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

पुण्यात दररोज ३५ टक्के पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 03:25 IST

इतर शहरांच्या तुलनेत दुप्पट पाणी वापर; तरी पाणीपट्टी थकली

- श्रीकिशन काळेपुणे : पुणे महापाालिका सध्या खडकवासला धरण प्रकल्पातून दररोज १३५ कोटी लिटर पाणी उचलत आहे. प्रतिमाणशी ३३७ लिटर पुणेकरांना पाणी मिळते. हे पाणी इतर शहरांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. असे असतानाही येथे पाणीपट्टीचे ५०० कोटीथकले असून तब्बल ३५ टक्के पाण्याची गळती होत आहे.शहराची लोकसंख्या साधारण ५० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे महापालिका जलसंपदा विभागाकडून १३५० एमएलडी पाणी घेते. महापालिका अधिक पाणी वापरते म्हणून दौंड, हवेली, इंदापूर या तालुक्यांना कमी पाणी पडत असल्याचे जलसंपदा सांगते. त्यामुळे या भागात पाण्यासाठी ओरड होते. पुणेकरांनी पाण्याची उधळपट्टी केल्यास उन्हाळ्यात कमतरता जाणवेल, असा इशारा जलसंपदा विभाग वेळोवेळी देत असते. तरी शहरातील पाणी वापर कमी झालेला दिसत नाही. पुणेकरांना दरदिवशी प्रतिमाणसी ३३७ लिटर पाणी मिळत आहे. इतर शहरांच्या तुलनेत हे पाणी दुप्पट आहे. यावर मीटर हाच पर्याय असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.नवीन जलवाहिन्या टाकणारशहरातील जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. या जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. या जलवाहिन्या लवकरच बदलण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. पाणपट्टीचे थकलेले ५०० कोटी वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.प्रशासनाने पाणी मोफत दिले पाहिजे; पण, जर कोणी पाण्याचा अपव्यव करीत असेल तर मग त्यावर कडक कारवाई करायला हवी. पाणी जपून वापरावे म्हणून ते महाग केले जाणे हा काही पर्याय नाही. नागरिकांनीही पाणीबचतीवर लक्ष दिले पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे.- उपेद्र धोंडे, जलतज्ज्ञ२४ तास पाणी हवे, तर होणार अधिक खर्च2600 कोटी रुपये खर्च शहरात समान पाणीपुरवठा योजना लागू करण्यासाठी होणार आहे.48 किलोमीटरच्या पाइपलाइन आणि ६७ टाक्या बांधण्याची कामे गेल्या वर्षभरात झाली आहेत. ही योजना पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर शहरात समान पाणीपुरवठा होईल.अपव्यय टाळण्यासाठी मीटरचा पर्यायपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मीटरद्वारे पाणीपुरवठा करणे हा एकमेव पर्याय आहे. जे मोजले जात नाही त्याचे व्यवस्थापन करता येत नाही. एकदा का मीटरद्वारे पाणी पुरविण्याची व्यवस्था आणि त्यावर देखरेख करणारी व्यवस्था उभारली की, पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे शक्य होते. त्यातून पाणीबचतीचा प्रचार-प्रसारही करता येतो. पाण्याचा पुरवठा मोजणी करूनच देणे अत्यंत गरजेचे आहे.- अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा प्रमुख, महापालिका