शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

राज्यात ३ हजार ४६६ शाळा एक शिक्षकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:09 IST

राज्य शासनाच्या मिशन ब्लॅक बोर्ड या उपक्रमांतर्गत नव्वदच्या दशकात राज्यातील एकशिक्षकी शाळा शिक्षकी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे शाळांसाठी ...

राज्य शासनाच्या मिशन ब्लॅक बोर्ड या उपक्रमांतर्गत नव्वदच्या दशकात राज्यातील एकशिक्षकी शाळा शिक्षकी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे शाळांसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले गेले. परंतु, गेल्या काही वर्षांत शाळांच्या संख्येत वाढ झाली. त्यातही इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे आकर्षित होणा-या विद्यार्थ्यांमुळे शासकीय व मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत गेली. विद्यार्थीसंख्या कमी झाल्यामुळे तसेच अनेक वर्षांपासून शिक्षक भरती न केल्यामुळे पुन्हा एकशिक्षकी शाळा निर्माण झाल्या.

राज्यात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ३ हजार १९० शाळा एकशिक्षकी आहेत. तर खाजगी अनुदानित १३० आणि खाजगी विनाअनुदानित १५५ शाळा एकशिक्षकी आहेत. त्यामुळे अजूनही राज्यातील अनेक शाळांचा कारभार एकाच शिक्षकांवर चालत आहे. विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने दुर्गम भागातील काही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सर्वच क्षेत्रांतून त्यावर टीका झाल्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. परंतु, विद्यार्थीच नाहीत अशा दुर्गम भागात शाळा सुरू ठेवून उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर एक किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असेल तर त्या शाळेत विद्यार्थी जातील का, असाही प्रश्न पालक उपस्थित करत आहे.

---------

राज्य शासनाने द्विशिक्षकी शाळेचे धोरण स्वीकारले आहे. परंतु, अनेक वेळा हे धोरण कागदावर राहते. एखादा शिक्षक आजारी पडला किंवा रजेवर गेला तर शाळा बंद पडू नये, त्यामुळे द्विशिक्षकी शाळा असणे गरजेचे आहे.

- गोविंद नांदेडे, माजी प्राथमिक शिक्षण संचालक,

--------------

राज्य शासनाने द्विशिक्षकी शाळेचे धोरण स्वीकारले असले तरी गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढत आहे. या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेत असल्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यामुळे कागदोपत्री द्विशिक्षकी शाळा असूनही एक शिक्षकी शाळा सुरू ठेवावी लागत आहे.

- एन. के. जरग, माजी शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य