शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

आंबिल ओढा दुर्घटनेप्रकरणी कुटुंबीयांना ३ लाखांची मदत

By admin | Updated: January 11, 2017 04:01 IST

आंबिल ओढा येथील चेंबरमध्ये पडून एक १४ वर्षांचा मुलगा वाहून गेला. पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे त्या मुलाला हकनाक आपले प्राण गमवावे लागले

पुणे : आंबिल ओढा येथील चेंबरमध्ये पडून एक १४ वर्षांचा मुलगा वाहून गेला. पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे त्या मुलाला हकनाक आपले प्राण गमवावे लागले. यावरून मुख्य सभेमध्ये नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. महापौर प्रशांत जगताप यांनी त्या मुलाच्या कुटुंबीयांना ३ लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. महापालिकेच्या मुख्य सभेला सुरुवात होताच नगरसेवकांकडून आंबिल ओढ्यातील दुर्घटनेप्रकरणी प्रशासनाकडे विचारणा करण्यात आली. स्थानिक नगरसेवक धनंजय जाधव आणि मनीषा घाटे यांनी याचा खुलासा मागितला. महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळे १४ वर्षीय मुलाला प्राण गमवावे लागले आहेत. प्रशासनाकडून चेंबर फोडून तसाच ठेवण्यात आला होता. शेजारी स्वच्छ भारत अभियानाचे काम सुरू आहे, त्यासाठीच हा चेंबर फोडण्यात आला असल्याचा आरोप घाटे यांनी केला. त्या मुलाच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देण्याची मागणी त्यांनी केली. आर्थिक मदत देण्यासाठी पालिकेने निश्चित केलेल्या नियमावलीनुसार त्याच्या कुटुंबीयांना ३ लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश महापौरांनी दिले. मुख्य सभेपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये त्या मुलाच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. (प्रतिनिधी)दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेतदांडेकर पुलाजवळील आंबिल ओढ्यातील दुर्घटनेमध्ये झालेल्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी महापालिकेच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी आयुक्तांकडे केली आहे. आंबिल ओढ्यामध्ये पाणी अडवून एस्केव्हेटरने गाळ काढण्याचे काम सुरू होते. परंतु मुलाच्या मृत्यूनंतर मात्र पालिकेने ते काम पालिकेमार्फत सुरू नव्हते असा पवित्रा घेतला आहे. जो अत्यंत घातक, दिशाभूल करणारा आणि अनेक नव्या प्रश्नांना जन्म देणारा आहे, असे कुंभार यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील सर्व नद्या, नाले, ओढे हे देखभालीसाठी फार वर्षांपूर्वी पालिकेकडे वर्ग झाले असून, त्यांच्या देखभालीची जबाबदारी ही पालिकेचीच आहे. त्यामुळे या कामाबद्दल तीन शक्यता निर्माण होतातगाळ काढण्याचे जे काम सुरू होते ते एकतर पालिकेचे होते. काम पालिकेच्या अपरोक्ष चालले होते आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. निविदा दुसऱ्या कामाची आणि प्रत्यक्षात काम मात्र आंबिल ओढ्यात सुरू होते आणि या तिन्ही प्रकरणांत पालिकेला आपली जबाबदारी झटकता येणार नाही.