शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

नियम मोडणाऱ्यांकडून वसूल केले २९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाकाळात बाहेर फिरण्यावर बंदी असताना, तसेच मास्क अनिवार्य असताना या नियांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाकाळात बाहेर फिरण्यावर बंदी असताना, तसेच मास्क अनिवार्य असताना या नियांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. गेल्या वर्षभरात आतापर्यंत ६ लाख ९७ हजार ५७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून २९ कोटी ७३ लाख ८० हजार ८२३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून अद्यापही पालन होताना दिसत नाही. अनेक जण विनामास्क रस्त्यांवर फिरताना आढळत आहेत. तर दुकानदार, व्यापाऱ्यांना वेळेचे बंधन असून मर्यादेपेक्षा जास्त वेळ दुकाने सुरू ठेवली जात आहेत. सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची वेळ आहे. तर, शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन, असे निर्बंध प्रशासनातर्फे सुरू आहे. तसेच विनाकारण, विनामास्क फिरण्यावर बंदी आहे. मात्र, अनेक जण बिनदिक्कतपणे या नियमांचे उल्लंघन करून बिनधास्तपणे बाहेर फिरताना दिसत आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांनी अशांवर थेट कारवाई करत त्यांची वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार महानगर पालिका, ग्रामपंचयात, नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस, तसेच वाहतूक शाखेकडून अशांवर गेल्या वर्षापासून कारवाई सुरू आहे.

पुणे महापालिकेने आज अखरेपर्यंत ३३ हजार २७२ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी २६ लाख ३२ हजार ५३८ रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, पोलिसांनी ३ लाख ७७ हजार ५५७ जणांवर कारवाई करत १८ कोटी १५ लाख ६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने आतापर्यंत २० हजार २०२ नागरिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून १ कोटी १४ लाख ८२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. तर, पोलीस विभागामार्फत ४४ हजार २७९ नागरिकांवर कारवाई करत २ कोटी २६ लाख ९१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ग्रामीण भागात ग्रामपंचायत, नगरपालिका आणि पोलिसांनी कारवाई केली. ग्रामपंचायतीने आतापर्यंत ५७ हजार ९७८ जणांवर दंडात्मक कारवाई केली. १ कोटी ८३ लाख ७२ हजारांचा दंड वसूल केला.

पोलिसांनी ८३ हजार ६२९ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ७४ लाख ७६ हजार वसूल केले. तर नगर परिषदांनी ८० हजार १५४ जणांवर कारवाई करत २ कोटी ७८ लाख ८३ हजार ३८५ रुपयांची वसुली केली.

चौकट

२० दिवसांत वसूल केले ५ कोटी आठ लाख

मे महिन्यात १ लाख ४ हजार ८७१ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून जवळपास ५ कोटी ८ लाख ४६ हजार ३७५ दंड गेल्या २० दिवसांत प्रशासनाने वसूल केला आहे.