शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

नियम मोडणाऱ्यांकडून वसूल केले २९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाकाळात बाहेर फिरण्यावर बंदी असताना, तसेच मास्क अनिवार्य असताना या नियांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाकाळात बाहेर फिरण्यावर बंदी असताना, तसेच मास्क अनिवार्य असताना या नियांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. गेल्या वर्षभरात आतापर्यंत ६ लाख ९७ हजार ५७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून २९ कोटी ७३ लाख ८० हजार ८२३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून अद्यापही पालन होताना दिसत नाही. अनेक जण विनामास्क रस्त्यांवर फिरताना आढळत आहेत. तर दुकानदार, व्यापाऱ्यांना वेळेचे बंधन असून मर्यादेपेक्षा जास्त वेळ दुकाने सुरू ठेवली जात आहेत. सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची वेळ आहे. तर, शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन, असे निर्बंध प्रशासनातर्फे सुरू आहे. तसेच विनाकारण, विनामास्क फिरण्यावर बंदी आहे. मात्र, अनेक जण बिनदिक्कतपणे या नियमांचे उल्लंघन करून बिनधास्तपणे बाहेर फिरताना दिसत आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांनी अशांवर थेट कारवाई करत त्यांची वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार महानगर पालिका, ग्रामपंचयात, नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस, तसेच वाहतूक शाखेकडून अशांवर गेल्या वर्षापासून कारवाई सुरू आहे.

पुणे महापालिकेने आज अखरेपर्यंत ३३ हजार २७२ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी २६ लाख ३२ हजार ५३८ रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, पोलिसांनी ३ लाख ७७ हजार ५५७ जणांवर कारवाई करत १८ कोटी १५ लाख ६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने आतापर्यंत २० हजार २०२ नागरिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून १ कोटी १४ लाख ८२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. तर, पोलीस विभागामार्फत ४४ हजार २७९ नागरिकांवर कारवाई करत २ कोटी २६ लाख ९१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ग्रामीण भागात ग्रामपंचायत, नगरपालिका आणि पोलिसांनी कारवाई केली. ग्रामपंचायतीने आतापर्यंत ५७ हजार ९७८ जणांवर दंडात्मक कारवाई केली. १ कोटी ८३ लाख ७२ हजारांचा दंड वसूल केला.

पोलिसांनी ८३ हजार ६२९ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ७४ लाख ७६ हजार वसूल केले. तर नगर परिषदांनी ८० हजार १५४ जणांवर कारवाई करत २ कोटी ७८ लाख ८३ हजार ३८५ रुपयांची वसुली केली.

चौकट

२० दिवसांत वसूल केले ५ कोटी आठ लाख

मे महिन्यात १ लाख ४ हजार ८७१ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून जवळपास ५ कोटी ८ लाख ४६ हजार ३७५ दंड गेल्या २० दिवसांत प्रशासनाने वसूल केला आहे.