शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

घोडधरणात पक्त २.८७ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: March 17, 2016 03:05 IST

चिंचणी (ता. शिरूर) येथील घोडधरणामध्ये आज अखेर २.८७ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा असल्याची माहिती शाखा अभियंता एन. एस. साळवे यांनी दिली.

निमोणे : चिंचणी (ता. शिरूर) येथील घोडधरणामध्ये आज अखेर २.८७ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा असल्याची माहिती शाखा अभियंता एन. एस. साळवे यांनी दिली.या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये शिरूर, कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे साडेसहा हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आहे; मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे हे क्षेत्र घटत चालले आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ५६३९ द. ल. घ. फू. एवढी असून, त्यापैकी २१७२ द. ल. घ.फू. मृत, तर ३४६७ द. ल. घ. फू. हा उपयुक्त पाणीसाठा मानला जातो. धरणाच्या उभारणीपासून आतापर्यंत संबंधित खात्याच्या वतीने धरणात साठलेला गाळ काढण्याची खास अशी व्यवस्था न झाल्याने धरणपात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर गाळ आहे. त्यामुळे धरणाची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे.अलीकडच्या काळात पावसाचे कमी झालेले प्रमाण व या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नव्याने झालेल्या पाच धरणांमुळे बरेचसे पाणी वरच अडविले जाते. त्यामुळे २००० सालानंतर हे धरण अभावानेच १०० % भरले आहे.याशिवाय धरणाच्या पाण्यावर घोडगंगा सहकारी साखर कारखाना; तसेच रांजणगाव- कारेगाव औद्योगिक वसाहतीतील कारखाने या पाण्यावर चालतात. हे पाणी वाहून नेणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. श्रीगोंदा शहर, काष्टी ग्रामपंचायत व शिरूर -श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना या धरणामधून आहेत.मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या वर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे धरणामध्ये अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नाही. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वडज धरणातून ५०० द . ल. घ. फू. पाणी घोडधरणात सोडण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ २७० ते २८० द.ल.घ. फू. एवढेच पाणी प्रत्यक्ष धरणात पोहोचले. सध्या धरणात केवळ २.८७ टक्के म्हणजे, १४४ द.ल.घ. फू.एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. साठलेल्या गाळामुळे हा साठा कमी ठरू शकतो. त्याचप्रमाणे इनामगाव, शिरसगाव, गणेगाव या भागात असलेले पाचही बंधारे कोरडे आहेत. दि. ६ ते ११ मार्च या कालावधीत उजव्या व डाव्या कालव्याला पिण्यासाठी पाणी सोडले होते. (वार्ताहर)उन्हाळी आवर्तन सोडता येणे शक्य नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे सध्या या भागात असलेल्या पिकांचे भवितव्य धोक्यात असून, उन्हाळ्यात पिके पाण्याअभावी जळून जातील. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. शिवाय, पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.