शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घोडधरणात पक्त २.८७ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: March 17, 2016 03:05 IST

चिंचणी (ता. शिरूर) येथील घोडधरणामध्ये आज अखेर २.८७ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा असल्याची माहिती शाखा अभियंता एन. एस. साळवे यांनी दिली.

निमोणे : चिंचणी (ता. शिरूर) येथील घोडधरणामध्ये आज अखेर २.८७ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा असल्याची माहिती शाखा अभियंता एन. एस. साळवे यांनी दिली.या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये शिरूर, कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे साडेसहा हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आहे; मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे हे क्षेत्र घटत चालले आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ५६३९ द. ल. घ. फू. एवढी असून, त्यापैकी २१७२ द. ल. घ.फू. मृत, तर ३४६७ द. ल. घ. फू. हा उपयुक्त पाणीसाठा मानला जातो. धरणाच्या उभारणीपासून आतापर्यंत संबंधित खात्याच्या वतीने धरणात साठलेला गाळ काढण्याची खास अशी व्यवस्था न झाल्याने धरणपात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर गाळ आहे. त्यामुळे धरणाची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे.अलीकडच्या काळात पावसाचे कमी झालेले प्रमाण व या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नव्याने झालेल्या पाच धरणांमुळे बरेचसे पाणी वरच अडविले जाते. त्यामुळे २००० सालानंतर हे धरण अभावानेच १०० % भरले आहे.याशिवाय धरणाच्या पाण्यावर घोडगंगा सहकारी साखर कारखाना; तसेच रांजणगाव- कारेगाव औद्योगिक वसाहतीतील कारखाने या पाण्यावर चालतात. हे पाणी वाहून नेणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. श्रीगोंदा शहर, काष्टी ग्रामपंचायत व शिरूर -श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना या धरणामधून आहेत.मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या वर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे धरणामध्ये अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नाही. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वडज धरणातून ५०० द . ल. घ. फू. पाणी घोडधरणात सोडण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ २७० ते २८० द.ल.घ. फू. एवढेच पाणी प्रत्यक्ष धरणात पोहोचले. सध्या धरणात केवळ २.८७ टक्के म्हणजे, १४४ द.ल.घ. फू.एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. साठलेल्या गाळामुळे हा साठा कमी ठरू शकतो. त्याचप्रमाणे इनामगाव, शिरसगाव, गणेगाव या भागात असलेले पाचही बंधारे कोरडे आहेत. दि. ६ ते ११ मार्च या कालावधीत उजव्या व डाव्या कालव्याला पिण्यासाठी पाणी सोडले होते. (वार्ताहर)उन्हाळी आवर्तन सोडता येणे शक्य नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे सध्या या भागात असलेल्या पिकांचे भवितव्य धोक्यात असून, उन्हाळ्यात पिके पाण्याअभावी जळून जातील. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. शिवाय, पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.