पुणे : जिल्ह्यात २८ टँकरने २७ गावे व १४८ वाड्यांना सुमारे ४८ हजार ९१३ लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला ३४ टँकरने ६३ हजार ४0५ लोकसंख्येला पाणीपुरवठा होत होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आजच्या तारखेला ६ टँकर कमी आहेत. यात बारामतीत सर्वाधिक ८ टँकर सुरू असून, गेल्या महिनाभरापासून ही संख्या स्थिर आहे. त्या पाठोपाठ पुरंदर तालुक्यात ५ टँकर सुरू आहेत. २८पैकी शासकीय टँकर २४ तर खासगी टँकर ४ आहेत. २ पिकव्हॅनद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, तो भोर तालुक्यात आहे. प्रशासनाने १७ विहिरी व २ खासगी बोअरचे अधिग्रहण केले आहे. (प्रतिनीधी)आंबेगाव : २ (४) बारामती : ८ (८) भोर : ३ (४) दौंड : २ (0) हवेली : २ (५) इंदापूर : 0 (२) जुन्नर : 0 (१) खेड : ३ (४) पुरंदर : ५ (२) शिरूर : १ (0) वेल्हा : २ (४) ४जिल्ह्यात यंदा इंदापूर, मुळशी, मावळ, जुन्नरला टँकर नाहीत.४गेल्या वर्षी दौंडला एकही टँकर नव्हता. यंदा २ टँकर, तर शिरूरला एकही टँकर नव्हता, यंदा १ टँकर.४गेल्या वर्षी पुरंदरला फक्त २ टँकर होते, यंदा ५ टँकर सुरू.४गेल्या वर्षी हवेलीत ५ टँकर होते, यंदा दोनच.
२८ टँकरने पाणीपुरवठा
By admin | Updated: May 26, 2015 23:18 IST