शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

गतवर्षीच्या तुलनेत २५० कोटी अधिक खरीप पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गतवर्षी कोरोनाचे संकट, लाॅकडाऊन आणि उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे खरीप पीक कर्जांचे अपेक्षित वाटप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गतवर्षी कोरोनाचे संकट, लाॅकडाऊन आणि उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे खरीप पीक कर्जांचे अपेक्षित वाटप झाले नाही. परंतु यंदा जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासूनच अधिकचे लक्ष देऊन बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जास्तीत जास्त व वेळेत पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिले. यामुळेच आतापर्यंत २३५८ कोटी ८३ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत २५० कोटींचे कर्ज अधिक वाटप केले आहे. दरम्यान, अद्यापही १५ टक्के उद्दिष्ट बाकी असून, सर्व विशेषतः खासगी बँकांनी खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एफआयडीडीचे व्यवस्थापक पीयूष गोयल, नाबार्डचे रोहन मोरे, बँक ऑफ महाराष्ट्राच्या उपमहाव्यवस्थापक वीणा राव, जिल्हा अग्रणी बँकेचे श्रीकांत कारेगावकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) प्रकल्प संचालक शालिनी कडूपाटील आणि जिल्ह्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, बँकांनी शेतकऱ्यांना खरीप कर्जवाटप व विविध सरकारी योजनांच्या कर्ज वाटपासाठी वर्षाच्या सुरुवातीपासूनच काटेकोरपणे नियोजन करावे, जेणेकरून उद्दिष्ट गाठणे शक्य होईल. त्यासाठी शासकीय योजनांबाबतचा विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेण्यात येईल. कोविड काळातही जिल्ह्यातील बँकांनी समाधानकारक काम केले असून किसान क्रेडीट कार्ड (पीक कर्ज) खरिपाचे २३५८ कोटी ८३ लाख वाटप केले आहेत. ८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण होणे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. खरीप कर्जवाटपाचे पूर्ण उद्दिष्ट गाठण्यासाठी बँकांनी सूक्ष्म नियोजन करावे. पंतप्रधान स्वनिधी योजनेबाबत १६ सप्टेंबर रोजी शिबिर आयोजित करावे. युवकांना स्वयंरोजगारासाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेअंतर्गत स्थानिक पातळी व संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील विविध बँकांच्या प्रतिनिधींनी मागील सहा महिन्यांच्या कामकाजाचा आढावा सादर केला.