शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर २५ जोडप्यांची नोंदणी पद्धतीने लग्नगाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST

पुणे : अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जात असल्याने यादिवशी हमखास विवाहाचा मुहूर्त गाठण्याचकडे जोडप्यांचा कल ...

पुणे : अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जात असल्याने यादिवशी हमखास विवाहाचा मुहूर्त गाठण्याचकडे जोडप्यांचा कल असतो. मात्र, कोरोनाच्या निर्बंधांमुळे अनेकांच्या मनसुब्यांवर विरजण पडले. अनेकांना विवाह लांबणीवर टाकावा लागला. काहींनी हाच मुहूर्त साधला पण विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन लग्नगाठ बांधली. शुक्रवारी (दि. १४ मे) या मुहूर्तावर जवळपास २५ विवाह झाल्याची माहिती विवाह नोंदणी अधिकारी डी. ए. सातभाई यांनी ‘लोकमत’ला दिली.

‘विवाह’ हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सुंदर आणि अविस्मरणीय क्षण असतो. आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत लग्नकार्य करण्याची मजा काहीशी वेगळीच असते. मात्र कोरोनाने त्यात मोडता घातला. गेल्या वर्षी अनेकांनी मुहूर्त पाहून विवाहकार्याचे नियोजन केले. त्यात अनेक जोडप्यांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त खास निवडला होता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील निर्बंधांमुळे विवाहांच्या संख्येवर मर्यादा आली आहे. केवळ २५ लोकांच्याच उपस्थितीतच विवाह पार पाडण्याचा नियम अनेकांना जाचक वाटत असल्याने बहुतांश जोडप्यांनी विवाहकार्य लांबणीवर टाकले. काहींनी रद्द करण्याचा मार्ग पत्करला.

त्यामुळे अक्षय तृतीया असूनही गेल्यावर्षीप्रमाणेच मोजके विवाह यंदा झाले. थोडक्यांनी या मुहूर्तावर विवाह पार पाडायचा आणि ही तारीख यादगार करण्याचा निश्चय करून विवाह नोंदणी कार्यालयाकडे धाव घेतली. यातून २५ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. “कोरोना संकटामुळे भव्यदिव्य विवाह सोहळे करण्यापेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे कुटुंबीयांचा कल वाढला,” असल्याचे निरीक्षण सातभाई यांनी नोंदवले.

----------

दाते पंचागानुसार मे महिन्यामध्ये विवाहाचे १४ मुहूर्त आहेत. तर एप्रिल ते जुलै या कालावधीत विवाहाचे ४० मुहूर्त आणि मुंजीचे १० मुहूर्त असल्याचे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

-------

शहरामध्ये २५० मंगल कार्यालये, दीडशे लॉन्स, २७५ बँक्वेट हॉल आणि क्लब हाऊस मिळून नऊशे ठिकाणी विवाह सोहळे होतात.

-------

एप्रिल ते जून हा विवाहकार्याचा हंगाम असतो. मुंज, डोहाळे जेवणासारखी सारखी मंगल कार्येदेखील साजरी होतात. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हा सर्व हंगाम हातातून गेला. अनेकांनी विवाह रद्द केले. कोरोनामुळे मंगल कार्यालयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यापुढील काळात मंगल कार्यालये चालवायची तरी कशी, असा प्रश्न आहे.

प्रसाद दातार, संचालक, प्रतिज्ञा मंगल कार्यालय

-----------