शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
4
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
5
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
6
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
7
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
8
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
9
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
10
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
11
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
12
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
13
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
14
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
15
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
16
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
17
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
18
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
19
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
20
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर

३३ वर्षांत २३ आराखडे; समस्या जैसे थे!

By admin | Updated: October 1, 2015 01:15 IST

पुण्याच्या वाहतूक समस्येवर आराखड्यावर आराखडे झाले. सल्लागारांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला गेला. मात्र, वाहतूक सुधारणा काही झाली नाही

सुनील राऊत पुणेपुण्याच्या वाहतूक समस्येवर आराखड्यावर आराखडे झाले. सल्लागारांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला गेला. मात्र, वाहतूक सुधारणा काही झाली नाही. गेल्या ३३ वर्षांत तब्बल २३ आराखडे महापालिकेने केले आहेत. मात्र, नव्याच्या नादात आपणच केलेल्या जुन्या उपाययोजनांचा विसर पडला आहे. गेल्या ३३ वर्षांत तब्बल २३ आराखडे तयार करण्यात आले. मात्र, त्यावर उपाययोजनाच झालेली नसल्याने वाहतूक समस्या ‘जैसे थे’ राहिली आहे.शहराची वाहतूक समस्या १९८0च्या दशकात तुलनेने कमी होती. त्यानंतर पुढील वर्षात २००० पर्यंत शहरातील वाहनांनी ९ लाखांचा आकडाही गाठलेला नव्हता. मात्र, भविष्यात शहराचा वाढणारा विस्तार आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन महापालिका तसेच राज्यशासनाने १९८१ पासूनच वाहतूक समस्या सोडविण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्याअंतर्गत १९८१ साली महापालिकेकडून सायकलींचे शहर असलेल्या पुण्यात सायकलमार्गाचे जाळे तयार करण्यासाठी सायकल नेटवर्क प्रोजेक्ट फॉर पुणे हा प्रकल्प हाती घेतला. त्याचे काम नगररचना विभागाकडे देण्यात आले. २०००पर्यंत राज्यशासनाकडून तब्बल १२ वाहतूक नियोजनाचे आराखडे तयार करण्यात आले. पुढे २००० ते २०११ पर्यंत शहराच्या विकासाचा वेग दरवर्षी तब्बल २५ टक्क्यांहून अधिक होता. त्यामुळे २००१ मध्ये ९ लाखांवर पोहोचलेली वाहनांची संख्या २०१२ मध्ये २३ लाखांच्या घरात जाऊन पोहचली. त्यानंतर दरवर्षी जवळपास प्रत्येक वर्षी दोन ते अडीच लाख नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे मार्च २०१५ अखेर ही संख्या २६ लाखांच्या वर पोहोचली आहे. ही वाहनांची वाढ लक्षात घेऊन महापालिकेने २००१ ते २०११ पर्यंत आणखी ११ वाहतूक नियोजन आराखडे तयार केले.सल्लागार शुल्कापुरती अंमलबजावणी ? महापालिका तसेच राज्यशासनाच्या विविध विभागांकडून करण्यात आलेले हे वाहतूक नियोजनाचे आराखडे कागदावरच आहेत. या आराखड्यांची चर्चा केवळ ते तयार करण्यात आल्यानंतर त्यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागारांना वेळेवर फी देण्यापुरतीच झाल्याचे दिसून येते. विशेष बाब म्हणजे महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाकडे यातील अनेक आराखड्यांची माहितीच नाही. त्यामुळे यातील मेट्रो आणि सर्वंकष वाहतूक आराखडा वगळता महापालिकेकडून एकाही आराखड्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचे यावरून स्पष्टपणे दिसून येते.