शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

३३ वर्षांत २३ आराखडे; समस्या जैसे थे!

By admin | Updated: October 1, 2015 01:15 IST

पुण्याच्या वाहतूक समस्येवर आराखड्यावर आराखडे झाले. सल्लागारांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला गेला. मात्र, वाहतूक सुधारणा काही झाली नाही

सुनील राऊत पुणेपुण्याच्या वाहतूक समस्येवर आराखड्यावर आराखडे झाले. सल्लागारांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला गेला. मात्र, वाहतूक सुधारणा काही झाली नाही. गेल्या ३३ वर्षांत तब्बल २३ आराखडे महापालिकेने केले आहेत. मात्र, नव्याच्या नादात आपणच केलेल्या जुन्या उपाययोजनांचा विसर पडला आहे. गेल्या ३३ वर्षांत तब्बल २३ आराखडे तयार करण्यात आले. मात्र, त्यावर उपाययोजनाच झालेली नसल्याने वाहतूक समस्या ‘जैसे थे’ राहिली आहे.शहराची वाहतूक समस्या १९८0च्या दशकात तुलनेने कमी होती. त्यानंतर पुढील वर्षात २००० पर्यंत शहरातील वाहनांनी ९ लाखांचा आकडाही गाठलेला नव्हता. मात्र, भविष्यात शहराचा वाढणारा विस्तार आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन महापालिका तसेच राज्यशासनाने १९८१ पासूनच वाहतूक समस्या सोडविण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्याअंतर्गत १९८१ साली महापालिकेकडून सायकलींचे शहर असलेल्या पुण्यात सायकलमार्गाचे जाळे तयार करण्यासाठी सायकल नेटवर्क प्रोजेक्ट फॉर पुणे हा प्रकल्प हाती घेतला. त्याचे काम नगररचना विभागाकडे देण्यात आले. २०००पर्यंत राज्यशासनाकडून तब्बल १२ वाहतूक नियोजनाचे आराखडे तयार करण्यात आले. पुढे २००० ते २०११ पर्यंत शहराच्या विकासाचा वेग दरवर्षी तब्बल २५ टक्क्यांहून अधिक होता. त्यामुळे २००१ मध्ये ९ लाखांवर पोहोचलेली वाहनांची संख्या २०१२ मध्ये २३ लाखांच्या घरात जाऊन पोहचली. त्यानंतर दरवर्षी जवळपास प्रत्येक वर्षी दोन ते अडीच लाख नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे मार्च २०१५ अखेर ही संख्या २६ लाखांच्या वर पोहोचली आहे. ही वाहनांची वाढ लक्षात घेऊन महापालिकेने २००१ ते २०११ पर्यंत आणखी ११ वाहतूक नियोजन आराखडे तयार केले.सल्लागार शुल्कापुरती अंमलबजावणी ? महापालिका तसेच राज्यशासनाच्या विविध विभागांकडून करण्यात आलेले हे वाहतूक नियोजनाचे आराखडे कागदावरच आहेत. या आराखड्यांची चर्चा केवळ ते तयार करण्यात आल्यानंतर त्यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागारांना वेळेवर फी देण्यापुरतीच झाल्याचे दिसून येते. विशेष बाब म्हणजे महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाकडे यातील अनेक आराखड्यांची माहितीच नाही. त्यामुळे यातील मेट्रो आणि सर्वंकष वाहतूक आराखडा वगळता महापालिकेकडून एकाही आराखड्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचे यावरून स्पष्टपणे दिसून येते.