शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

आठ जागांसाठी २३ नगरसेवक रिंगणात

By admin | Updated: September 29, 2014 05:41 IST

आघाडीत बिघाडी आणि महायुतीत काडीमोड झाल्याने शहरात सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढणार आहेत

पुणे : आघाडीत बिघाडी आणि महायुतीत काडीमोड झाल्याने शहरात सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढणार आहेत. त्यामुळे ऐन वेळी उमेदवारीसाठी राजकीय पक्षांची धावाधाव झाली असली, तरी या आठ जागांवर वर्णी लावण्यासाठी महापालिकेच्या तब्बल २३ नगरसेवकांची लॉटरी लागली आहे. त्यात काही बंडखोर नगरसेवकांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत अशा प्रकरे एवढ्या मोठ्या प्रमाणात संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.गेली २५ वर्षे असलेली शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती आणि गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचे सूत न जुळल्याने हे चारही पक्ष एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. मात्र, या युती आणि आघाडीमुळे ज्या पक्षांकडे शहरातील आठ मतदारासंघांमध्ये जे मतदारसंघ आपल्या मित्रपक्षांकडे, त्या मतदारसंघामध्ये या चारही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कधीच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील आठ मतदारसंघांमध्ये सुमारे २३ नगरसेवकांचे अर्ज आहेत. त्यात प्रमुख पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या नगरसेवकांसह बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांचाही समावेश आहे. शहरात उमेदवारी देण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये सर्वाधिक प्रत्येकी ६ नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसने आणि मनसेने संधी दिलेली आहे, त्या खालोखाल भारतीय जनता पक्षाने ३, शिवसेनेने २, तर काँग्रेसने एका उमेदवारास संधी दिलेली आहे. तर पाच नगरसेवक पक्षाकडून विद्यमान आमदारांविरोधात संधी न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत. तर तीन माजी नगरसेवकही शहरतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (प्रतिनिधी)